आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण

भारतात दिसणार नसल्याने सुतककाळ पाळण्याची गरज नाही

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चालू वर्षातील पहिले सूर्यग्रहण मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण दुपारी 3:26 ते संध्याकाळी 7:57 पर्यंत राहील. मात्र, ते भारतातून दिसणार नसल्याने लोकांना घाबरण्याची किंवा कोणत्याही विशिष्ट नियमांचे (सुतककाळ) पालन करण्याची आवश्यकता नाही. हे  सूर्यग्रहण कुंभ आणि धनिष्ठा नक्षत्रात होत असून हे कंकणाकृती किंवा वर्तुळाकार सूर्यग्रहण असेल. अशा प्रकारच्या ग्रहणात सूर्याभोवती एक तेजस्वी वर्तुळ स्पष्टपणे दिसते. खगोलशास्त्राच्या भाषेत याला ‘रिंग ऑफ फायर’ असे म्हणतात.

गर्भवती महिला, वृद्ध, मुले आणि आजारी लोकांसाठी सूर्यग्रहण सामान्यत: धोकादायक मानले जाते. त्यांना या काळात अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, सर्वसामान्यपणे हे नियम सूर्यग्रहण दिसणाऱ्या भागातच पाळावे लागतात.

Comments are closed.