रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर ॲम्ब्युलन्सला अपघात, 7 जण प्रवासी असल्याची बातमी, खराब हवामानामुळे संपर्क तुटला

रांची: झारखंडची राजधानी रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या चार्टर्ड एअर ॲम्ब्युलन्सचा चतरा जिल्ह्यात अपघात झाला आहे. विमानाचे अवशेष सिमरिया पोलीस स्टेशन हद्दीतील काथियातू येथे सापडले. या विमानात सात जण बसल्याचे वृत्त आहे. सुरुवातीला खराब हवामान हे अपघाताचे कारण सांगितले जात आहे.

एअर ॲम्ब्युलन्स पलामू-लातेहार दरम्यान कुठेतरी बेपत्ता झाल्याची माहिती आधी समोर आली होती, पण नंतर चतरा येथे अपघात झाल्याची पुष्टी झाली. विमान रात्री दिल्लीला पोहोचणार होते, मात्र टेक ऑफच्या काही वेळातच हा अपघात झाला.

टेकऑफनंतर २४ मिनिटांनी संपर्क तुटला

मिळालेल्या माहितीनुसार, या चार्टर्ड ॲम्ब्युलन्सने रांची विमानतळावरून संध्याकाळी 7.10 वाजता उड्डाण केले. टेकऑफनंतर अवघ्या 24 मिनिटांनी संध्याकाळी 7:34 वाजता त्याचा एटीसीशी संपर्क तुटला.

प्रक्रियेनुसार, रांची विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर, विमानाचा संपर्क पुढील स्थानकावर सोपवण्यात आला, परंतु वाराणसी एअर कंट्रोलशी त्याचा संपर्क स्थापित होऊ शकला नाही. तेव्हापासून विमान बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. विमानाने रांची विमानतळाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, त्यामुळे काही गंभीर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता बळावली होती.

खराब हवामान हे अपघाताचे कारण होते का?

विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हवामान खराब झाले. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले असावे, त्यामुळे ही मोठी दुर्घटना घडल्याचे मानले जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण सविस्तर तपासानंतरच समजेल. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

Comments are closed.