Mumbai pollution – जरा खिडकीतून बाहेर बघा, ते धुकं नाही प्रदूषण आहे; आदित्य ठाकरेंचा BMC वर निशाणा

देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वाढलेले धुलीकण, धुरके याचा त्रास लहान मुले, वृद्ध नागरिक आणि श्वसनविकाराच्या रुग्णांना सोसावा लागत आहे. यावरून अनेकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला जाब विचारला. आता पुन्हा एकदा मुंबईतील हवेच्या खालावलेल्या स्तरावर चिंता व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेला धारेवर धरले आहे.

आदित्य ठाकरे यांनी X वर यासंदर्भात ट्वीट केले आहे. या पोस्टमध्ये बीएमसीच्या अधिकृत अकाऊंटला टॅग करत त्यांनी म्हटले की, जरा खिडकीतून बाहेर डोकावून बघा… तुम्हाला काहीतरी पांढरे आणि धुसर दिसेल… ते प्रदूषण आहे. हीच दूषित हवा आपण सर्वजण श्वसना वाटे आत घेत आहोत,” अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य मांडले.

प्रदूषणाच्या या संकटावर मात करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मुंबईतील सर्व खासगी बांधकामे किमान एक आठवड्यासाठी तातडीने थांबवण्यात यावीत. तसेच, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र बांधकाम व्यवस्थापन वेळापत्रकतयार करावे आणि प्रदूषणाविरुद्धच्या नियमांची कडक अंमलबजावणी झाल्यानंतरच पुढील कामांना परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, सामान्य मुंबईकरांचा जीव गुदमरतोय याने तुम्हाला काहीच फरक पडत नाहीये. फक्त कोणताही व्हीआयपी आठवडाभरासाठी शहरात येतोय असे समजा, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा टीका केली.

किमान आठवडाभर मुंबईतील खासगी बांधकामे रोखा! आदित्य ठाकरे यांचे पालिका आयुक्तांना पत्र

Comments are closed.