‘अशा मनोरंजनाची गरज काय?’ ब्रेकमधील लेझर शोवरून सुनील गावस्कर आणि रवी शास्त्रींनी वर्ल्ड कपमधील नियोजनाचे वाभाडे काढले

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनी रविवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० विश्वचषक सुपर-८ लढतीदरम्यान ‘ड्रिंक्स ब्रेक’मध्ये करण्यात आलेल्या लेझर शोवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानने पॉवरप्ले संपला तेव्हा २ बाद ५३ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर नियोजित विश्रांती (ब्रेक) घेण्यात आली. या तीन मिनिटांच्या अंतरात स्टेडियममधील दिवे मंद करून लेझर शो आयोजित करण्यात आला होता, ज्यामुळे मैदानात क्षणभर अंधार झाला होता. प्रकाशातील या अचानक बदलामुळे फलंदाजांचे लक्ष विचलित होऊ शकते आणि त्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता गावस्कर आणि शास्त्री यांनी व्यक्त केली.

फलंदाजांसाठी हे सोपे नाही – गावस्कर

‘ड्रिंक्स ब्रेकच्या अडीच-तीन मिनिटांत लेझर शो करणे… हे फलंदाजांसाठी किंवा कोणासाठीही सोपे नसते’, असे गावस्कर यांनी कॉमेंट्री दरम्यान म्हटले.

डोळ्यांना पुन्हा प्रकाशाची सवय होण्यासाठी वेळ लागतो, कारण तुमच्या आजूबाजूला पूर्णपणे अंधार केलेला असतो. अशा प्रकारचे सोहळे जागतिक स्पर्धेत अनावश्यक असल्याचे गावस्कर यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, ‘हा विश्वचषक आहे. अडीच मिनिटांच्या ब्रेकसाठी तुम्हाला अशा मनोरंजनाची गरज आहे का? आयपीएलच्या मध्यंतरात हे ठीक आहे, पण बाद फेरीच्या सामन्यात नाही. किमान वर्ल्ड कपमध्ये तरी ड्रिंक्स इंटरव्हलमध्ये या लेझर शोची गरज आहे का?’.

रवी शास्त्री यांनीही या मताला दुजोरा दिला असून खेळाडूंच्या एकाग्रतेवर होणाऱ्या परिणामावर भर दिला. शास्त्री म्हणाले, ‘खेळाडूंच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा खेळावर लक्ष केंद्रित करणे कधीही सोपे नसते. हा अतिशय गंभीर विषय आहे’.

संजू सॅमसनची वादळी खेळी

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, संजू सॅमसनने सर्व चर्चांना पूर्णविराम देत नाबाद ९७ धावांची मॅचविनिंग खेळी साकारली. हिंदुस्थानने वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव करत टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हिंदुस्थानचा सामना इंग्लंडशी होईल.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने रोस्टन चेसच्या पायावर रोवमन पॉवेल (नाबाद ३४ धावा, १९ चेंडू) आणि जेसन होल्डर (नाबाद ३७ धावा, २२ चेंडू) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ४ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला होता. ईडन गार्डन्सवर ६५,००० पेक्षा जास्त प्रेक्षकांच्या उपस्थितीत, जेव्हा हिंदुस्थानचे फॉर्ममध्ये असलेले फलंदाज दबावाखाली अपयशी ठरले, तेव्हा संजू सॅमसन खंबीरपणे उभा राहिला. त्याच्या शानदार खेळीमुळे हिंदुस्थानने १९.२ षटकांत ५ बाद १९९ धावा करत विजय मिळवला.

सुनील गावस्कर रवी शास्त्री स्लॅम T20 वर्ल्ड कप लेझर शो इडन गार्डन्स

माजी कर्णधार सुनील-गावस्कर आणि रवी-शास्त्री यांनी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 विश्वचषक स्पर्धेतील ड्रिंक्स ब्रेक दरम्यान लेझर शोच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजू-सॅमसनच्या ९७ धावांनी भारत उपांत्य फेरीत पोहोचला. Tezzbuzz अद्यतने.

कीवर्ड: सामना, सामना, सामना, दैनिक सामना, दैनिक सामना, सामना, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, संजू सॅमसन 97, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज T20 विश्वचषक, ईडन गार्डन्स लेझर शो विवाद, मराठी क्रिकेट बातम्या.

Comments are closed.