आपल्या देशात जीवाला काही किंमत आहे का? आदित्य ठाकरे यांचा संताप
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटात 19 कामगारांचा मृत्यू झाला. सोमवारी बोयसर येथील एका केमिकल फॅक्टरीत विषारी वायूची गळती झाली. या घटनांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारला फटकारले आहे.
काल नागपुरातील स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट झाला कारण “सुरक्षेचे उपाय पाळले गेले नाहीत”… आज पालघरमधील केमिकल युनिटमधून गॅस गळती…
आम्ही आमच्या स्वतःच्या समस्यांमध्ये गुंतलो आहोत जे आम्हाला खाली खेचत आहेत.
जसा मेट्रो लाईनच्या बांधकामाचा स्लॅब लोकांवर पडला… https://t.co/tRwsrVKZyQ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 2 मार्च 2026
”काल नागपूर येथील एका फॅक्टरीत स्फोट झाला. त्या ठिकाणी सुरक्षेची माणकं पाळली गेली नव्हती हे समोर आलं. आज पालघरमध्ये केमिकल प्लांटमधून विषारी वायूची गळती झाली. आपण आपल्याच समस्यांमध्ये असे गुंतले आहोत की या समस्या आपल्याला खाली खेचत आहेत. मध्यंतरी मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब काही लोकांवर कोसळला. त्यातील मृतांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. आपल्या देशात जीवाला काही किंमत आहे का? प्रशासन आहे तरी कुठे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केला आहे.
Comments are closed.