इराण-अमेरिकेतील तणावावर पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत शांततेच्या बाजूने!

नवी दिल्लीत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “पश्चिम आशियातील सद्यस्थिती आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. भारत सर्व वाद संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवण्यास समर्थन देतो. आम्ही या प्रदेशात उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व देशांसोबत जवळून काम करत राहू.”
भारत आणि कॅनडा दरम्यान झालेल्या करारांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की आम्ही संरक्षण उद्योग, सागरी क्षेत्र जागरूकता आणि लष्करी देवाणघेवाण वाढविण्यावर काम करू. या उद्देशाने आज आम्ही भारत-कॅनडा संरक्षण संवाद स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले की, दहशतवाद, अतिरेकवाद आणि कट्टरतावाद ही केवळ दोन्ही देशांसाठीच नाही तर संपूर्ण मानवतेसाठी समान आणि गंभीर आव्हाने आहेत यावर आम्ही सहमत आहोत. जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी त्यांच्या विरोधात आमचे निकटचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेत पीएम मोदी म्हणाले की, आमच्या पहिल्या भेटीपासून आमच्या संबंधांमध्ये नवीन ऊर्जा, परस्पर विश्वास आणि सकारात्मकता आली आहे. सहकार्याच्या प्रत्येक क्षेत्रात वाढत्या गतीचे श्रेय मी माझे मित्र पंतप्रधान कार्नी यांना देतो.
पंतप्रधान कार्ने यांचे भारतात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. याला आपण एक महत्त्वाचा टप्पा मानतो. गेल्या वर्षी कॅनडा येथे झालेल्या G7 बैठकीत माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे त्यांनी मनापासून स्वागत केले. आज त्याच सौहार्दाने त्याचं स्वागत करणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.
यूएई आणि जॉर्डनमधील हल्ल्यांबाबत इराणच्या राजदूताला समन्स!
Comments are closed.