शिव्या, टोमणे सगळं सहन केलं, पण… भारत चॅम्पियन होताच सगळा राग काढला, कोच गंभीर कुणावर संतापला

गौतम गंभीर T20 विश्वचषक 2026 : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. रविवार 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने किवींना 256 धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना किवींना 19 षटकांत 159 धावांतच गुंडाळण्यात आले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टीकाकारांवर जोरदार निशाणा साधला. प्रेस कॉन्फरन्स दरम्यान एका प्रश्नाने गंभीरचा संयम तुटला. मागील काही महिन्यांत जे त्याने सहन केले, त्याचा कडक प्रत्युत्तर त्याने थोडक्यात दिला.

भारत चॅम्पियन होताच कोणावर भडकला कोच गौतम गंभीर?

गंभीर म्हणाला की, “भले माझा काम करण्याचा किंवा प्लॅनिंगचा पद्धत समजून घेणं सगळ्यांना कठीण जाईल, पण त्यामागे एक दीर्घकालीन, विचारपूर्वक आखलेली स्ट्रॅटेजी आहे. माझी जबाबदारी सोशल मीडियावर लोकांसाठी नाही, माझी जबाबदारी त्या 30 लोकांसाठी आहे जे चेंज रूममध्ये आहेत.”

तो म्हणाला की, वाइट-बॉल फॉरमॅटमध्ये गेल्या 12 महिन्यांत आम्ही तीन महत्त्वाच्या ट्रॉफी जिंकल्या आहेत. कसोटी टीमच्या निकालावर टीका असली तरी, त्यांचा कामाचा फळ आता दिसून आले आहे.

गंभीर पुढे म्हणाला की, “कोच टीमपासून बनतो. खेळाडूंनी मला तो कोच बनवलं जो मी आहे. ही ट्रॉफी मी राहुल द्रविड़ आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना समर्पित करतो. राहुल भाईंनी भारतीय संघाला या पातळीवर नेलं, लक्ष्मण यांनी COE मध्ये खेळाडूंची पाइपलाइन तयार केली. अजित आगरकर यांनी प्रचंड टीका सहन केली आणि प्रामाणिकपणे काम केलं. जय भाईंनी माझ्या कठीण काळात मला फोन केला. सूर्यकुमारने माझं काम सोपं केलं.

दोन-दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय कोच

गौतम गंभीरचा हेड कोच म्हणून ट्रॉफी जिंकण्याचा प्रवास गेल्या वर्षी मार्चमध्ये दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीपासून सुरू झाला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये टी-20 आशिया कप जिंकला, आणि आता टी-20 विश्वचषकात अभूतपूर्व तिसरी ट्रॉफी जिंकली. भारताने सलग दुसऱ्यांदा हा खिताब जिंकला आणि घरच्या मैदानावर फाइनलमध्ये पोहोचणारा पहिला देश ठरला.

हे ही वाचा –

Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : ट्रॉफीचे खरे हक्कदार आपणच….; टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होताच सचिन-विराटसह सगळे दिग्गज भावूक, PM मोदी काय म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.