महिला आरक्षण विधेयकावर पंतप्रधान मोदी : नारीशक्ती विधेयक फेटाळले, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी

काल लोकसभेत नारीशक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित केलं.. विरोधकांनी विधेयकाची भ्रूणहत्या केली.. अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.. विधेयकाला विरोध करणारे देशाचे गुन्हेगार आहेत.. सुधारणांना विरोध करून काँग्रेसने देशाचं कायमच नुकसान केलं, अशी जोरदार टीका मोदींनी केली… आज देशासमोर असलेल्या सर्व मोठ्या समस्या या काँग्रेसमुळेच आहेत, असंही मोदी म्हणाले.. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी महिला सशक्तीकरणासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असं वक्तव्य मोदींनी त्यांच्या संबोधनात केलंय.. मोदींच्या आजच्या भाषणानंतर देशात पुुन्हा एकदा राजकारण तापणार असल्याचं दिसून येतंय…

Congress Mention Count : संबोधनात काँग्रेसचा वारंवार उल्लेख

महिला आरक्षण विधेयकावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात काँग्रेसचा अनेकदा उल्लेख केला. अंदाजे 60 वेळा काँग्रेसचे नाव घेत त्यांनी या पक्षावर राष्ट्रहिताला विरोध केल्याचा आरोप केला. विविध महत्त्वाच्या विधेयकांना काँग्रेसने विरोध केल्याचे सांगत त्यांनी तीन तलाक आणि समान नागरी कायदा (UCC) यांसारख्या मुद्द्यांचाही उल्लेख केला.

Opposition Parties Target : इतर विरोधी पक्षांवरही टीका

पंतप्रधानांनी केवळ काँग्रेसच नव्हे तर तृणमूल काँग्रेस (TMC), द्रविड मुनेत्र कळघम (DMK) आणि समाजवादी पक्ष (Samajwadi Party) यांसारख्या पक्षांवरही निशाणा साधला. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्या या पक्षांवर त्यांनी महिलांविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला.

ज्यावेळी महिलांच्या अधिकारांवर गदा येईल त्यावेळी त्याचा बदला घेतला जाईल. नारीशक्ती वंदन विधेयकाला ज्या लोकांनी विरोध केला, त्यांनी महिलांना गृहीत धरण्याची चूक केली. देशातील महिलांना विरोधकांची भूमिका समजली आहे. त्याचे परिणाम भोगावा लागणार, असं मोदी म्हणाले.

Women Reservation Bill : महिला हक्कांसाठी लढा सुरूच

पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक मतसंख्या मिळाली नसली तरी लढा थांबणार नाही. देशातील 100 टक्के नारीशक्तीचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत, असे म्हणत त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Comments are closed.