महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्थेचे तीनतेरा; महायुती सरकारविरुद्ध जनतेचा आक्रोश, मुख्यमंत्री फडणवीस आता गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या!
राज्यात खून, मारामारी, महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता गृह खाते सपशेल अपयशी ठरले आहे. राज्यात कायदा, सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून महायुती सरकारविरोधात जनतेतून आक्रोश व्यक्त केला जात आहे. नसरापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी चक्क सायरन वाजवत रुग्णवाहिकेतून आणलेला फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळताना पोलिसांशी मोठी झटापट झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
नसरापूर येथे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या चिमुरडीवरील अत्याचार तसेच महिलांचे वाढते लैंगिक शोषण, खून, मारामारी अशा वाढत्या घटनांच्या निषेधार्थ आज इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलन दडपण्याचा पोलिसांचा अनुभव पाहता, प्रचंड फौजफाटय़ासह आलेल्या पोलिसांना चकवा देत शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी चक्क सायरन वाजवत एका रुग्णवाहिकेतून गृहमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा आंदोलनस्थळी आणला. या वेळी झडप मारून पुतळा ताब्यात घेण्यासाठी सरसावलेल्या पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी पुतळा पेटवून दिला; पण पोलिसांनी तो विझवून ताब्यात घेतला. यामुळे संतप्त आंदोलकांनी महायुती सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलकास पायदळी तुडवत निषेध केला.
या वेळी कॉ. दिलीप पवार, भारती पवार, आर.के. पवार, अवधूत साळोखे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महिला आघाडीच्या अध्यक्षा वेदवती मोहिते, प्रवीण पाटील, विजय पटकारे आदी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भाकप आणि डाव्या आघाडीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राची क्षमा मागा
महाराष्ट्रात लैंगिक अत्याचार, बलात्कार, रक्त, लव्ह जिहाद यांसारखे गंभीर गुन्हे वारंवार घडत असल्याने महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असून महाराष्ट्र बदनाम होत आहे. एपंदरीतच घर खात्याचा व सरकारचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. पुणे जिह्यात घडलेल्या दोन कार्यक्रम गंभीर असून माणुसकीला काळिमा फासणाऱया आहेत. या घटनांचा तपास जलदगतीने होऊन गुन्हेगारांना फाशी देण्याचे काम सरकारने करावे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि घर मंत्र्यांनी महाराष्ट्राची क्षमा मागून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी केली.
पोलीस आयुक्तांनी घेतली बळी कुटुंबीयांची भेट
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज नसरापूर घटनेतील पीडीतेच्या कुटुंबाची भेट घेतली. आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत. या प्रकरणासाठी लवकरच विशेष सरकारी वकील नियुक्त केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Comments are closed.