बंगालमध्ये सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्री सकाळी 11 वाजता घेणार शपथ!

सुवेंदू अधिकारी यांनी ९ मे रोजी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासह राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक बदल नोंदवला गेला, कारण पहिल्यांदाच भाजपने पश्चिम बंगालमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले. भाजपने 294 सदस्यीय विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवून तृणमूल काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता संपवली.
कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर आयोजित भव्य शपथविधी समारंभात राज्यपाल आर. एन रवी यांनी सुवेंदू अधिकारी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. त्यांच्यासह अन्य पाच नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये दिलीप घोष, अग्निमित्र पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम तुडू आणि निसिथ प्रामाणिक यांचा समावेश होता.
आता मंत्रिमंडळ विस्तारामुळे भाजप सरकार प्रशासकीय पातळीवर आपली टीम आणखी मजबूत करणार आहे. नवीन मंत्र्यांची नियुक्ती करून सरकार विविध क्षेत्र आणि सामाजिक वर्गांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. नबन्ना येथे होणारा हा शपथविधी सोहळा पश्चिम बंगालच्या नव्या भाजप सरकारसाठी महत्त्वाचे राजकीय आणि प्रशासकीय पाऊल मानले जात आहे.
एसआयआर आणि उत्पन्न पडताळणी मोहिमेचा असा प्रभाव आहे; शिधापत्रिका यादीतून 5.5 लाख नावे काढली
Comments are closed.