टीम इंडिया खेळणार 600वा कसोटी क्रिकेटचा सामना, आतापर्यंत राहिला असा रेकॉर्ड





नवी दिल्ली : टीम इंडिया शनिवारी (15 ऑगस्ट) श्रीलंकेविरोधात कसोटी सामना खेळण्यास सुरुवात करणार आहे. 2 कसोटी सामन्यांच्या पहिल्या कसोटीला श्रीलंकेतील गॅले येथे सुरुवात होणार आहे. भारताच्या इतिहासात या सामन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण, टीम इंडियाचा हा 600 वा कसोटी सामना ठरणार असून युवा कर्णधार शुभमन गिल या सामन्यात संघांचे नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाचा कसोटीतील आलेख हा चढउतारांचा राहिला आहे. कारण, पहिला सामना तसेच मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला 20 वर्षे वाट बघावी लागली होती. Team India Test



Comments are closed.