गुरांच्या छावण्या सुरू करा, पाण्याचे टँकर, अन्न-धान्याची सोय करा… विशेष अधिवेशन बोलावून दुष्काळाबाबत तात्काळ निर्णय घ्या! – संजय राऊत
मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागाकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकं करपून गेली असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे. दुष्काळ भयंकर होत चालला असून 800 हून अधिक गावांमध्ये पाण्याचा टिपूस नाही. त्यामुळे सरकारने विशेष अधिवेशन बोलावून तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना केली.
Comments are closed.