निव्वळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा; अर्थसंकल्पावर पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका
विद्यापीठ बजेट 2025 वर पृथ्वीराज चवन: मोदी सरकारचे (नरेंद्र मोदी) निवडणुकीनंतरच अंदाजपत्रक आहे. निवडणुकीनंतर पहिल्या वर्षात काही कटू निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे आर्थिक सुधारणा करता येतात. असं काहीतरी होईल असं आम्हाला अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही. त्यामुळे देशाचा आर्थिक विकासदर मंदावत आहे. सरकारने देखील ते मान्य केलं आहे. 2047 पर्यंत भारत विकसित देश होणार हे स्वप्न दाखवत आहात, मात्र याची नेमकी व्याख्या काय हे सांगत नाही. दरडोई उत्पन्नात आपण 147 क्रमांकावर आहोत. लोकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न वाढवण गरजेचे होतं मात्र तसं होताना दिसत नसल्याही प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प 2025 सादर केला. यावर बोलताना त्यांनी निव्वळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात घोषणा केल्या असून आम्ही असमाधानी असल्याची टीका ही केली आहे.
शेतकर्यांचे अश्रु पुसतील ही अपेक्षा होती, परंतू…
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्हला देश विकसित झालेला आवडेल, मात्र केवळ घोषणाबाजी हे सरकार करत आहे. महत्वाचे धाडसी निर्णय सरकारने घेण गरजेचे होतं, मात्र तसं केलं नाही. केवळ बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही घोषणा यांनी केल्या आहेत. महागाईवर काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. आम्हला जी अपेक्षा होती की या बजेटमधून सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पुसतील. परंतु यांनी काहीच केलं नाही. शिक्षण क्षेत्रात देखील काहीच केलेलं नाही. अर्थमंत्र्यानी कृषी विभागाच कौतुक केलं, परंतु त्यांची प्रमुख मागणी हमीभाव मिळण्याच्या कायद्यासंदर्भात होती. मात्र याबाबत सरकारने काहीच केलं नसल्याचेही काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
तर शेतकरी आत्महत्या रोखणार कसे?
जर खर्चा पेक्षा कमी उत्पन मिळालं तर शेतकरी आत्महत्या रोखणार कसे? विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात अली आहे. आता परदेशी कंपन्या भारतात येतील. परदेशी विमा कंपन्या भारतात येतील मात्र इथल्या विमा कंपन्यांना भक्कम करण गरजेचे आहे. लॉंग टर्म कैपिटल गेनवर सूट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तसं काहीच झाल नाही. महागाईमुळे घर चालवणं अवघड होतं त्याबाबत काहीच हालचाल नाही. जॉब निर्मिती बाबत घोषणा होईल असं वाटलं होतं मात्र तसंही झालेलं नाही. शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होईल असं वाटत होतं, मात्र तस काहीच होतं नाही. चीनने एआय बाबत अमेरिकेला मागे टाकले आहे. यात आपण कुठे आहोत हा प्रश्न आहे. 23 आयआयटी सुरू करण्यात आलं आहे. परंतु आता तिथल्या दर्जा खालावण्याची परिस्थिती आहे. कारण तिथ शिकवायला स्टाफ नाही असेही काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.