लबाडांनो पाणी द्या!शिवसेनेचा आज छत्रपती संभाजीनगरात हल्लाबोल महामोर्चा,आदित्य ठाकरे करणार नेतृत्व

महापालिका प्रशासनाच्या निष्ठूर कारभारामुळे शहरात भयंकर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाच दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन असतानाही बारा ते पंधरा दिवसांनी शहराला पाणी मिळत आहे. महापालिका प्रशासनाच्या या तुघलकी कारभाराला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या वतीने उद्या महापालिकेवर ‘हल्लाबोल महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे करणार आहेत.
पाणीटंचाईविरोधात शिवसेनेच्या वतीने महिनाभर ‘लबाडांनो, पाणी द्या’ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा समारोप उद्या ‘हल्लाबोल’ मोर्चाने होणार आहे. दुपारी 4.30 वाजता क्रांतीचौकातून हा मोर्चा निघेल. गुलमंडीवर मोर्चाचा समारोप होईल.
Comments are closed.