Abhijeet Dipake CJP जय भिमच्या घोषणा, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, जंतर मंतरवर अभिजीत दीपकेंच्या CJP चे जोरदार आंदोलन
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आज भारतात परतले. दिल्लीच्या जंतरमंतर सुरु केलेल्या आंदोलनात दीपके यांनी नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कोक्रोच जनता पार्टी नीट परिक्षेच्या पेपरफुटीवरुन चांगलीच आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
राज्यकर्ते निर्लज्ज आहेत
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले माझ्या मित्रांनो, हा एक मोठा संघर्ष आहे. आम्ही सोशल मीडियावर प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करायला सुरुवात करून एक महिना झाला आहे, पण हे लोक इतके निर्लज्ज आहेत की कारवाई करण्याऐवजी, ते आमची अकाऊंट्स हॅक करणे आणि आमच्या पोस्ट्स हटवणे यांसारख्या इतर गोष्टींमध्ये गुंतले आहेत. तुम्ही आमच्या पोस्ट्स हटवू शकत असाल, पण तुम्ही आम्हाला या विश्वातून पुसून टाकू शकत नाही,” असे दीपके यांनी गर्दीला संबोधित करताना सांगितले.
शिक्षकांना प्रशिक्षण द्या आणि मगच..
आपण बँकिंगपासून शिक्षणापर्यंत सर्वकाही डिजिटल करत आहोत, पण चुकीच्या प्रथा थांबवू शकत आहोत का? याचे उत्तर नाही असे आहे. बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे आणि आता आपण शिक्षण क्षेत्रातही डिजिटलीकरणाचा परिणाम पाहत आहोत. माझा याला विरोध नाही, पण शिक्षकांचे योग्य मूल्यांकन आणि प्रशिक्षण झाल्यानंतरच याची सुरुवात करावी,” असे दिल्लीत उच्च शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थ्यांचे वडील, ५० वर्षीय राधेश्याम कैथल यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले.
मनीपूरच्या युवा उद्योजकाचं म्हणणं
“गेल्या तीन वर्षांपासून मणिपूरमध्ये अशांतता आहे. माझ्या राज्यात शाळा आणि महाविद्यालयांसहित काहीही सामान्यपणे चालत नाही. तेथील विद्यार्थी खूप तणावाखाली आहेत,” असे ३२ वर्षीय सामाजिक उद्योजक विन्सन म्हणाले. ते अशांततेमुळे दोन वर्षांपूर्वी मणिपूर सोडून सध्या नोएडामध्ये काम करतात.
“माझा चुलत भाऊ कुटुंबापासून दूर, कोटा येथील एका लहानशा खोलीत नीट (NEET) परीक्षेची तयारी करत होता. त्याला आशा होती की कमी दर्जाच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तरी तो तो स्वीकारेल. पण मग प्रश्नपत्रिका फुटली. तो तीन वर्षांहून अधिक काळ तयारी करत आहे. त्याला पुन्हा परीक्षेला बसण्यासाठी कसे प्रोत्साहित करावे हे आम्हाला कळत नाही,” असे मूळच्या राजस्थानच्या जयपूरच्या आणि सध्या दिल्लीत राहणाऱ्या ३४ वर्षीय गायत्री सिंग यांनी सांगितले.

“मी पक्षाला ऑनलाइन फॉलो करत होतो, पण आंदोलनाला यावे की नाही याबद्दल मला खात्री नव्हती. मी सकाळी १० वाजता रोहिणीमध्ये ऑफिसला जात होतो, पण अचानक मी येऊन परिस्थिती पाहावी असे ठरवले,” असे दिल्लीतील १८ वर्षीय रौनक कुमार म्हणाला. “पक्षाच्या भविष्याबद्दल मला माहिती नाही, पण सध्या तरी ते सर्वांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर बोलत आहेत—मग तुम्ही विद्यार्थी असाल किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणाची चिंता करणारे पालक,” असे कुमार म्हणाला.
https://www.instagram.com/p/DZPPv6bjJJO/?igsh=aGU0aXIyZWI5MHlu
देशातला युवा काय म्हणतोय?
हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार “सीजेपी चळवळीमुळे सोशल मीडियावरील लोक प्रत्यक्ष जमिनीवर उतरले आहेत, म्हणजेच ते अशा विषयांवर बोलत आहेत ज्यांच्याशी लोक कुठेतरी स्वतःला जोडून घेऊ शकतात. काही विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले आहे आणि लाखो विद्यार्थी सतत मानसिक दबावाखाली आहेत, आणि यासाठी कोणतीही जबाबदारी निश्चित केली जात नाही,” असे पेशाने मानसशास्त्रज्ञ असलेल्या ३८ वर्षीय सुगंधा म्हणाल्या.

झुरळांचे मुखवटे घालून आंदोलन
या निदर्शनासाठी शेकडो लोक, ज्यात प्रामुख्याने तरुण सहभागी होते, जमले होते. अनेकांनी झुरळांचे मुखवटे घातले होते आणि त्यांच्या हातात फुले होती. अनेक शालेय विद्यार्थीही त्यांच्या पालकांसोबत या आंदोलनात सहभागी झाले होते.
गर्दीमध्ये प्रामुख्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच तरुण व्यावसायिक होते, जे तरुणांच्या व्यापक सहभागाचे द्योतक होते.
आंदोलनस्थळी, सीजेपीने नीट पेपरफुटी प्रकरण, सीबीएसईच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीशी संबंधित कथित अनियमितता आणि परीक्षेसंबंधित इतर कथित त्रुटींच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे अनेक नारे दिले. ‘जय भीम’ व्यतिरिक्त, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे” आणि “धर्मेंद्र प्रधान, राजीनामा द्या!” यांसारख्या घोषणाही देण्यात आल्या.
Comments are closed.