धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 8 वीच्या विद्यार्थ्याकडून 10 वीच्या मुलाचा खून; शाळा परिसरात खळबळ

अहिलीनगर: शहरातील सिताराम सारडा विद्यालयामध्ये (School) एका विद्यार्थ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेच्या आवारातच संबंधित विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर, जखमी अवस्थेतच या विद्यार्थ्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयात उपचाराला घेऊन जात असतानाच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे एकाच शाळेतील दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ मारहाणीच्या घटनेचं रुपांतर हत्या होण्यापर्यंत पोहोचलं आहे. या घटनेतील दोन्ही शालेय मुले अल्पवयीन आहेत. याप्रकरणी, पोलीस (Police) अधिक तपास करत आहेत.

शाळेत मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांची भांडणे झाली, या भांडणाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याकडून झालेल्या मारहाणीत 10 वीच्या विद्यार्थ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  दरम्यान, शहरातील सिताराम सारडा ही नावाजलेली शाळा असून सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी काही काळ याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळेला जामीन, 66 दिवसानंतर सुटका

आणखी वाचा

Comments are closed.