चार्दम यात्रा दरम्यानच्या सर्व हेलिकॉप्टर सेवांनी बंदी घातली
केदारनाथमधील दुर्घटनेनंतर सरकारचा कडक पवित्रा
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी आर्यन एव्हिएशनसह सर्व कंपन्यांच्या हेलिकॉप्टर सेवा तात्काळ बंद केल्या आहेत. केदारनाथमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय डीजीसीएने (नागरी उ•यन महासंचालनालय) सुरक्षा मानकांबाबत घेतलेल्या कठोर पावलांचा एक भाग आहे. डीजीसीएने सर्व हेलिकॉप्टर ऑपरेटर्सना सुरक्षा मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही निष्काळजीपणावर त्वरित कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रवास सुरक्षित करण्यासाठी कडक एसओपी (मानक कार्यपद्धती) तयार करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
उत्तराखंड सरकारने पुढील आदेशापर्यंत चारधाम यात्रेतील सर्व हेलिकॉप्टर सेवांवर बंदी घातली आहे. सध्या 15 आणि 16 जून रोजी चारधाम यात्रा करणाऱ्या सर्व हेलिकॉप्टर कंपन्यांच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. खराब हवामान असूनही आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर उ•ाण करत असताना मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघाताची चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक वैमानिक खराब हवामानात उ•ाण करताना आढळले आहेत. त्यापाठोपाठ आता गौरीकुंडहून केदारनाथला जाणारे आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने हेलिकॉप्टर सेवांबाबत कडक निर्णय घेतल्याचे दिसत आहे.
समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
हेलिकॉप्टर अपघातानंतर मुख्यमंत्री धामी यांनी रविवारी मुख्य सचिवांना तांत्रिक तज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. ही समिती हेली ऑपरेशन्सच्या सर्व सुरक्षा आणि तांत्रिक बाबींचा सर्वंकष आढावा घेऊन नवीन एसओपी तयार करणार आहे. हेलिकॉप्टर सेवा पूर्ण सुरक्षितता, पारदर्शकता आणि सर्व निर्धारित निकषांचे पालन करून चालतील याची खात्री करेल. बाधित प्रवाशांबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री धामी यांनी राज्य सरकार मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत करेल, असे स्पष्ट केले. तसेच अपघाताच्या कारणांची त्वरित चौकशी करण्याचे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
Comments are closed.