तळ ठोकून बसा नाही तर विकासाचे गाजर दाखवा विजय शिवसेनेचाच होणार, अमोल किर्तीकर यांनी भाजपला सुनावले

पक्ष फोडाफोडी झाली. लोकप्रतिधींना पळवून झाले. खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्यात आले. मात्र तरी सुद्धा शिवसेनेच्या विरोधात लढताना सत्ताधाऱ्यांना अजूनही लोकांना विकासाचे गाजर दाखवावे लागते आणि याने सुद्धा शिवसैनिक आपल्याकडे वळत नाही म्हणून गल्ली बोळात देखील कित्येक दिवस सत्ताधाऱ्यांना तळ ठोकून बसावे लागते. याचाच अर्थ शिवसेनेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पक्ष सोडून गेले असले तरी शिवसैनिक अजुनही जागेवरच आहे. मुळ शिवसेनेतच आहे हेच शिवसैनिक सत्ताधाऱ्यांच्या विजयाचा मनसुभा उधळून टाकतील याचीच मनात भिती असलेल्यांना तळ ठोकून बसावे लागते हाच शिवसेनेचा खरा विजय असल्याचे शिवसेना उपनेते आणि युवा सेना राष्ट्रीय सरचिटणीस अमोल किर्तीकर यांनी ठणकावून सांगितले.

Comments are closed.