खताच्या तुटवडय़ामुळे शेतकरी हवालदील, कर्जमाफीचे काय झाले; अनिल देशमुख यांचा फडणवीस सरकारला सवाल

पेरणी हंगाम जवळ येवून सुध्दा आवश्यक असलेली खते बाजारात उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. एकीकडे शेतकरी शेतात राबराब राबुन उत्पादन घेतो. नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसान होते. परंतु, त्याला नुकसान भरपाई मिळत नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जममाफीच्या आश्वासनाचे काय झाले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

त्याला मदत मिळत नाही. जो शेतमाल तो बाजारात आणतो त्याला मातीमोल भाव मिळत असल्याने साधा उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे त्याच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत जाहीर सभेत सत्ता आल्यास शेतकऩयांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सत्ता येवून सात महिने झाले परंतु यावर कोणताही निर्णय झाला नाही. आता खरीपाच्या पेरणीसाठी लागणारे खते बाजारात नसल्याने शेतकऩयांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. राज्यात डि.ए.पी. सह युरीया व इतर मिश्रखतांना मोठया प्रमाणात तुटवडा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Comments are closed.