ऑपरेशन सिंदूरसाठी कौतुक केल्याबद्दल आर्मीचे आभार
देशवासीयांची पत्रं दर्शविणारा व्हिडिओ केला शेअर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सैन्याकडून एक व्हिडिओ सोशल मीडिया साइट एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत सैन्याचे अदम्य साहस आणि समर्पणावरून देशाच्या सामान्य नागरिकांनी लिहिलेल्या पत्रांचे संकलन असून यात ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सैनिकांचे अतूट समर्थन, प्रशंसा आणि आभार दर्शविण्यात आला आहे. मुले, वृद्ध, महिला आणि युवांकडून लिहिण्यात आलेली पत्रं या व्हिडिओत दर्शविण्यात आली असून या पत्रांद्वारे भारतीय सैन्याचे बलिदान आणि शौर्याला सलाम करण्यात आला आहे. सीमांवर तैनात प्रत्येक सैनिकामागे गर्व अन् कृतज्ञतेने भरलेला एक पूर्ण देश उभा असल्याचे या पत्रांच्या माध्यमातून देशवासीयांनी दाखवून दिले आहे. या व्हिडिओच्या अखेरीस ‘भारतीय सैन्य-सदैव राष्ट्रसेवेत, सन्मान आणि समर्पणासह’ असा भावपूर्ण संदेश आहे.
एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट होताच हजारो लोकांनी तो शेअर केला आणि ‘जय हिंद’, ‘सॅल्यूट टू इंडियन आर्मी’, ‘रियल हीरोज’ यासारख्या संदेशांसह भावना व्यक्त केल्या आहेत. भारतीय सैन्य केवळ युद्धभूमीत नव्हे तर प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वत:चे स्थान सन्मान, अभिमानासह राखून असल्याचे हा व्हिडिओ दाखवून देतो.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी भारतीय सैन्याने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी अ•dयांना नष्ट केले होते. या कारवाईत अनेक कुख्यात दहशतवादी मारले गेले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान संबंध बिघडले होते. पाकिस्तानकडून भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला होता, भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडत चोख प्रत्युत्तर दिले होते. भारताने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत पाकिस्तानच्या 14 सैन्यतळांना उद्ध्वस्त केले होते.
Comments are closed.