समाजभान – कुटुंब व्यवस्थेचे संवर्धन
>> आशिष निनगुरकर, [email protected]
कुटुंबातील सण-उत्सव सर्वांनी एकत्रितपणे साजरे करणे, यानिमित्ताने कौटुंबिक नात्यांना वेळ देणे, एकत्रित भोजन, भ्रमण करणे, घरातील एकोपा जपणे, निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने योग्य वस्तूंचा वापर करणे, घरात उत्साह, आनंद वाढवणे, कौटुंबिक सोहळ्यांमधून आनंदाचे क्षण वृद्धिंगत करणे, आपले घर भारतीय पद्धतीने सजविणे अशा गोष्टी कुटुंबाला, नात्याला अधिक दृढ करतात. विश्व कुटुंब दिवसाचा हाच खरा अर्थ आहे.
भारतीय कुटुंब संस्था ही एक प्राचीन व अत्यंत महत्त्वाची अशी संस्था आहे. आपली संयुक्त कुटुंब पद्धती ही पाश्चात्त्य देशांतील अभ्यासकांचा कुतूहलाचा विषय आहे. कालानुरूप त्यात अनेक बदल होत गेले. मात्र, कुटुंब संस्थेच्या भूमिका व जबाबदाऱया आजही कायम व तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कुटुंबाचे संवर्धन आणि चिरंतन कल्याणासाठी कुटुंब प्रबोधन महत्त्वाचे. कुटुंब प्रबोधन संकल्पना इथे मांडत आहे.अत्यंत प्राचीन व तितकीच महत्त्वाची एक व्यवस्था म्हणजे आपली कुटुंब संस्था. आपण सगळेच या संस्थेचे सदस्य आहोत व हीच संस्था आपल्या मानसिक, भावनिक, आर्थिक, शारीरिक, लैंगिक व सामाजिक गरजा एकाच छताखाली पूर्ण करीत असते.
?खरे तर प्रत्येक मुलाची पहिली शाळा ही त्याचे कुटुंब असते. सामाजिकीकरणाची प्रािढयादेखील याच व्यवस्थेतून सुरू होत असते. धर्म, रीतिरिवाज, संस्कृती, भाषा प्रकटीकरणाच्या पद्धती, नातेसंबंधांची ओळख व जोपासना, सामाजिकीकरण व अगदी भावभावनांचे व्यवस्थापनदेखील याच शाळेत प्रत्येक मूल शिकत असते. स्नेह, त्याग, समर्पण, सहकार्य, संयम, कृतज्ञता, सेवाभाव, प्रसंगी माघार घेणे ही कुटुंब व्यवस्थेचे जतन व संवर्धन करण्यास पूरक मूल्येही याच कुटुंब संस्थेतून आपण शिकत असतो. कुटुंब संस्था बजावत असलेली भूमिका व पार पाडत असलेल्या जबाबदाऱया तसेच त्यामुळे आपल्या गरजांची होत असलेली पूर्तता पाहता या व्यवस्थेचे महत्त्व आपल्या सगळ्यांनाच आहे हे नक्की.
आपल्या सगळ्यांच्याच जीवनात कुटुंब संस्थेचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मुलाची पहिली शाळा ही त्याचे कुटुंबच असते. धर्म, रीतिरिवाज, संस्कृती, भाषा, प्रकटीकरणाच्या पद्धती, नाते-संबंधांची ओळख व जोपासना, सामाजिकीकरण, अगदी भावभावनांचे व्यवस्थापनदेखील याच शाळेत प्रत्येक मूल शिकते. संयुक्त कुटुंबात अनेक वयोगटांतील सदस्य असल्यामुळे दैनंदिन जीवन व्यवहारातून, सर्वच सदस्य कृती व अनुभवांच्या माध्यमातून समृद्ध व मूल्याधिष्ठित आयुष्याचे सूत्र आत्मसात करतात. संयम, कृतज्ञता, त्याग, सेवाभाव, प्रसंगी माघार घेणे ही मूल्ये परस्पर व्यवहारातून शिकली जातात. मात्र, कालानुरूप कुटुंबांची रचना बदलत असताना जीवन-व्यवहार कौशल्ये शिकविणारी ही व्यवस्था कुठे तरी कमकुवत होताना दिसते. म्हणूनच पुन्हा एकदा कुटुंब प्रबोधनाचे कार्य हाती घेणे आज गरजेचे झाले आहे.
श्रीमंती ही काही आकडय़ांत मोजली जाऊ शकते. मात्र, एखाद्या कुटुंबाचे ऐश्वर्य मोजताना जोडलेली माणसे, नातेसंबंधातील गुंतवणूक, प्रसंगी एखाद्याच्या मदतीला धावून जाणारे किंवा संबंधितांच्या मदतीला धावून येणारे या संख्येतून नक्कीच मोजता येईल. खरं तर कुटुंबाचे आरोग्य हे सगळ्यांनी ‘अर्थभान’ जपण्यातून सांभाळले जाते. ज्या कुटुंबाला योग्य ठिकाणी, योग्य तितकाच खर्च करण्याची कौशल्ये अवगत असतात ती कुटुंबे आपल्या नेमक्या गरजा ओळखू शकतात. ईर्षा, स्पर्धा किंवा मोठेपण या गोष्टींना फाटा देत कमावलेला पैसा व खर्चाचे नियोजन याची उत्तम सांगड घालत चार पैसे राखणारी ही कुटुंबे असतात. ‘काटकसर’ या शब्दाचा नेमका अर्थ जाणणारी ही कुटुंबे असतात. सुख, आनंद किंवा समाधान हे पैशांच्या विनियोगातून मिळते, उधळपट्टीतून नव्हे हे जाणारी ही कुटुंबे ‘संपन्न परिवार’ असतात.
कुटुंबातील सण-उत्सव सर्वांनी एकत्रितपणे साजरे करणे, यानिमित्ताने कौटुंबिक नात्यांना वेळ देणे, एकत्रित भोजन, भ्रमण, भजन करणे. भारतीय कुटुंबास साजेशी भूषा करणे, आपल्या घरात तुळस, काही फळाफुलांची झाडे लावणे, निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने योग्य वस्तूंचा वापर व विल्हेवाट लावण्याच्या पद्धतींचा अवलंब करणे, आपले घर भारतीय पद्धतीने सजविणे अशा अनेक गोष्टी करणाऱया कुटुंबांना ‘मंगल’ व ‘हरित परिवार’ असे म्हणता येईल. असे म्हणतात खरा धर्म हा ‘माणुसकीचा’ असतो. एकमेकांना ‘माणूस’ म्हणून वागविणे, समाजाच्या उतरंडीवरील अगदी शेवटच्या घटकाशीदेखील माणूसपणाने वागविणे, आपल्याला सेवा देणाऱया लोकांना व समाजास प्रसंगी धावून जाऊन मदत करणे, प्रसंगी आपल्या कुटुंबात आमंत्रित करणे या सगळ्या गोष्टी कुटुंबांतून होणे गरजेचे आहे.
अशा कृतीतून समाजातील विविध घटकांमध्ये स्नेहाचा साकव बांधणारी कुटुंबे ही ‘समरसता व सेवा’ परिवार असतात. आज समाजात मांडले जाणारे नको ते विमर्श, कुटुंब संस्थेवर येऊन आदळणारी बाह्य संस्कृतीतील आव्हाने व भावी पिघडविताना काही प्रसंगी होणारे दुर्लक्ष यावर आपण काम करणे आज अनिवार्य आहे.आपल्या सर्व गरजांची पूर्तता करणारी ही व्यवस्था आजही डौलाने उभी आहे. सकस व परिपूर्ण व्यक्ती घडविणाऱया या व्यवस्थेचे, परदेशातील लोकांना मोठे कुतूहल आहे. ही व्यवस्था अधिक सक्षम, क्रियाशील व्हावी याकरिता आपले सामूहिक प्रयत्न मात्र अधिक दमदार होणे आवश्यक आहे.
Comments are closed.