आशिया कप 2025 सुपर-4 पाँइंट्स टेबल: भारत अपराजित शिखरावर, श्रीलंकेचा सपशेल पराभव
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने शुक्रवारी, 26 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या सुपर-4 च्या अखेरच्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने जोरदार लढत दिली, पण त्यांचीही घोडदौड 202 धावांवर थांबली. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये भारताने श्रीलंकेला धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने आशिया कप 2025 मधील अपराजित कामगिरी कायम ठेवली.
ग्रुप स्टेजनंतर सुपर-4 मध्येही भारताने आपले सर्व सामने जिंकले आणि पॉइंट्स टेबलवर एकहाती वर्चस्व गाजवले. पाकिस्तानने दोन सामने जिंकत दुसरे स्थान पटकावले व भारतासोबत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. बांग्लादेश तिसऱ्या स्थानावर राहिला तर ग्रुप स्टेजमध्ये गाजलेली श्रीलंका सुपर-4 मध्ये एकही सामना जिंकू शकली नाही.
आशिया कप 2025 सुपर-4 पॉइंट्स टेबल
युनियन | समोर | विजय | पराभव | टाय | कोणताही परिणाम नाही | गुण | निव्वळ रन रेट |
---|---|---|---|---|---|---|---|
भारत | 3 | 3 | 0 | 1 | 0 | 6 | 0.913 |
पाकिस्तान | 3 | 2 | 1 | 0 | 0 | 4 | 0.329 |
बांगलादेश | 3 | 1 | 2 | 0 | 0 | 2 | -0.831 |
श्रीलंका | 3 | 0 | 3 | 1 | 0 | 0 | -0.418 |
टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतासाठी अभिषेक शर्माने पुन्हा एकदा धडाकेबाज सुरुवात केली. त्याने फक्त 31 चेंडूत 61 धावा केल्या. त्यानंतर संजू सॅमसन (39) व तिलक वर्मा (49*) यांनी डाव सावरत भारताला 202 धावांपर्यंत पोहोचवले.
श्रीलंकेकडून पथुम निसांका (107) व कुसल मेंडिस (58) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी करत सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या क्षणी जोरदार पुनरागमन केले आणि श्रीलंका 202 धावांवर रोखली गेली.
सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने भारतासमोर फक्त 3 धावांचे लक्ष्य ठेवले, जे सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर गाठत भारताला विजय मिळवून दिला.
Comments are closed.