तरुणाच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवणारी मुलगी दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिली आली, अख्खी बारामती
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">बारामती: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिला, अल्पवयीन मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि मानसिक त्रासाच्या घटना पाहता खरंच त्या सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. अशातच बारामतीत एका तरूणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने काही दिवसांपूर्वी टोकाचं पाऊल उचलत स्वत:ला संपवलं. त्या मुलीने दहावीची परिक्षा दिली होती. ही मुलगी इयत्ता दहावीत शाळेत पहिली आली आल्याची माहिती आहे. पीडित मुलगी ही अभ्यासात खूप हुशार होती. तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. पण त्रासाला आणि छळाला कंटाळून या मुलीने स्वत:चं जीवन संपवलं. दोन दिवसांपूर्वी दहावीचा निकाल लागला. शाळेत ती पहिली आली. मात्र, तिचं हे यश पहायला आणि त्याचा आनंद घेण्यासाठी ती जगात नाही, त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना ही बारामती तालुक्यातील एका गावात घडली आहे.
स्वतःचे यश आणि कौतुक सोहळा पाहण्यासाठी ती नाही
बारामतीतील कोहाळे खुर्द येथे तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या एका मुलीचा नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत 78.40 टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक मिळविल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी (दि. 13) दहावीचा निकाल लागला. त्यात ती मुलगी पहिली आल्याचे कळताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. स्वतःचे यश आणि कौतुक सोहळा पाहण्यासाठी तीच या जगात नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला.
तू माझ्याशी यात्रेपूर्वी लग्न कर, अन्यथा…
मिळालेल्या माहितीनुसार, तू माझ्याशी यात्रेपूर्वी लग्न कर, अन्यथा, तुझ्या घरच्यांना कोयत्याने उडवून टाकीन, अशी धमकी दिल्याने या मुलीने घरात गळफास घेत आपले जीवन संपवलं होतं, ही घटना गेल्या महिन्यात घडली होती. याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य आरोपीसह अन्य तिघांविरोधात पोक्सोसह तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल केला होता. दहावीची परीक्षा संपल्यानंतर तिने कोर्स सुरू केला होता, त्यासाठी ती रोज ये-जा करीत होती. 2 एप्रिल रोजी तिने कुटुंबीयांना तिला होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती. गावातील काही तरुण दुचाकीवरून तिचा पाठलाग करीत त्रास देत होते. ‘तू जर माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या घरातील कोणालाही जिवंत ठेवणार नाही, सर्वांची कोयत्याने मुंडकी उडवीन, शिवाय गावच्या यात्रेपूर्वी लग्न कर, अन्यथा तुझ्या घरच्यांना संपवणार,’ अशी धमकी तिला दिली गेली होती.
मुख्य आरोपीचे काही मित्र तिला वहिनी असं म्हणत चिडवत होते. तिच्या सोशल मिडीयावरती देखील तिला काही मेसेजही पाठविण्यात आले होते. अखेर हा त्रास असह्य झाल्याने तिने 8 एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली होती. सध्या ते तुरुंगात आहेत. परंतु, आता दहावीच्या निकालानंतर या मुलीच्या यशानंतर पुन्हा या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
Comments are closed.