बेलापूर-पनवेलदरम्यान 5 महिन्यांत 29 प्रवाशांचे बळी, हार्बर रेल्वे मार्ग बनला मृत्यूचा सापळा

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेपेक्षा सर्वाधिक सुरक्षित म्हणून ओळखला जाणारा हार्बर रेल्वे मार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर बेलापूर ते पनवेल न रेल्वे स्थानकांच्या दरम्यान पाच महिन्यांत 29 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. नवी मुंबई, खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने या मार्गावरील लोकलमध्ये नेहमीच गर्दी असते. गर्दीमुळे या मार्गावरील अपघातांच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पनवेल लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे मार्गांवर यंदा जानेवारी ते मे या 5 महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अपघाती घटनांमधून 29 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 31 जणांना जखमी झाले आहेत. अन्य उपनगरी मार्गाच्या तुलनेत हा मार्ग कमी वर्दळीचा व सुरक्षित समजला जात होता, मात्र हा मार्गही आता गर्दीचा व जीवघेणा द ठरत आहे. दरम्यान रेल्वे पोलिसांकडून विविध 5, प्रकारची जनजागृती केल्यानंतरही प्रवाशांकडून बेफिकीरपणाचे दर्शन घडत आहे. शॉर्टकटसाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडण्याची -. मानसिकता कमी झालेली दिसत नाही.
बेलापूर – पनवेल लोकल मार्गावर रूळ ओलांडताना लोकलची ठोकर लागून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गाडीतून पडून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यात तब्बल 28 पुरुष व एक महिला यांचा समावेश आहे.
जखमींमध्ये, गाडीतून पडून 17 जण, पाय घसरून पडले आहेत. विविध घटनांमध्ये एकूण 31 जण जखमी झाले आहेत. यात 22 पुरुष व 9 महिला यांचा समावेश आहे.
हार्बर मार्गावरील पनवेल लोहमार्ग हद्दीत बेलापूर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल व मेल मार्गावरील स्थानके अशा स्थानकांचा समावेश आहे.
रेल्वे कायद्यानुसार एखादी व्यक्ती अनधिकृतपणे रेल्वे रूळ ओलांडताना पथकांच्या हाती लागल्यास सदर व्यक्तीला एक हजार रुपये दंड किंवा सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद आहे.
जनजागृती नसल्यामुळे नागरिकांचा बेफिकीरपणा कमी होत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बळींची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे.
Comments are closed.