Bhagyashree Atram protest against Dharmarao baba Atram saying What happened to your promise?


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाग्यश्री आत्राम यांनी त्यांचे वडील म्हणजेच धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांच्याच क्षेत्रात आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यात आत्राम विरुद्ध आत्राम असे चित्र उभे ठाकले आहे.

Gadchiroli Politics : विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिता विरुद्ध कन्या अशी लढत झाल्याचे पाहायला मिळाली होती. मात्र भाग्यश्री आत्राम यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यात आत्राम विरुद्ध आत्राम असे चित्र उभे ठाकले आहे. (Bhagyashree Atram protest against Dharmarao baba Atram saying What happened to your promise?)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाग्यश्री आत्राम यांनी त्यांचे वडील म्हणजेच धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांच्याच क्षेत्रात आंदोलन सुरू केले आहे. महायुती सरकारने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने अद्यापही पूर्ण केलेली नाही. त्यामुळे भाग्यश्री आत्राम यांनी अहेरी तालुक्यातील आलापल्लीत आजपासून (23 जून) ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. ‘क्या हुआ तेरा वादा’ अशा शीर्षकाने केलेल्या आंदोलनामुळे भाग्यश्री आत्राम यांनी धर्मराव बाबा आत्राम यांना लक्ष केलं आहे. कारण धर्मराव बाबा आत्राम हे यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत आहे. दिलेल्या आश्वासनातील 25 मुद्दे सरकार आल्यावर महायुतीने पूर्ण केलेले नाहीत, असा आरोप करत भाग्यश्री अत्राम यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला आहे.

हेही वाचा – Nitesh Rane : …त्यावर आझमीसारखं कार्ट काहीच बोलत नाही; एकेरी उल्लेख करत राणेंची सडकून टीका

माध्यमांशी संवाद साधताना भाग्यशी आत्राम म्हणाल्या की, शासनाच्या विरोधात रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यासाठी आजपासून आम्ही बसलेलो आहोत. येथील पाच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत उपोषणाला बसलेले आहेत. सरकारकडून जोपर्यंत ठोस निर्णय किंवा आश्वासन आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही याठिकाणी आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही याठिकाणावरून उठणार नाही, असा इशारा भाग्यश्री आत्राम यांनी दिला.

दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने आम्ही आंदोलन करतोय

महायुती सरकारवर निशाणा साधताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या की, लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने हे सरकार निवडून आले. परंतु निवडून आल्यानंतर सरकार जनतेला आणि त्यांच्या मुलभूत गरजांना विसरून गेलं आहे. महायुती सरकारने निराधार पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना, शेतकरी कर्जमाफी, अखंडित वीज, धानाला बोनस, रस्ते आणि एसटी बस सेवा यासह या क्षेत्रातील अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रमुख मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत, म्हणून आम्ही आंदोलन करत असल्याचे भाग्यश्री आत्राम यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Politics : कोणी कितीही मिठाचा खडा टाकला तरी…; सेना-मनसे युतीवर काय म्हणाल्या सुषमा अंधारे?



Source link

Comments are closed.