लग्नाच्या मंडपात शोककळा; वऱ्हाड्यांची स्कॉर्पिओ थेट ट्रॅक्टरला धडकली; 8 पाहुण्यांचा जागीच अंत

बिहार रोड अपघात: बिहारमधील कटिहार येथे सोमवारी रात्री (5 मे 2025) एका भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. यात लग्नातील 8 पाहुण्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व 10 जण एकाच स्कॉर्पिओमधून प्रवास करत असताना हा अपघात झाला आहे. ही घटना पोठिया पोलीस स्टेशन परिसरात घडली असून चांदपूर येथील हनुमान मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला स्कॉर्पिओकार धडकल्याने हा भीषण अपघात झालाय. यातील जखमींना प्राथमिक उपचारानंतर जीएमसीएच (पूर्णिया) येथे रेफर करण्यात आलंय. तर घटनेतील  सर्व मृत पूर्णियाच्या बधरा कोठी येथील धिबरा बाजारचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

कुर्सेलाच्या कोशकीपूरला जात होती वरात, पण वाटेत अनर्थ घडला

घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांची गर्दी घटनास्थळी जमली. माहितीनंतर पोलिसही घटनास्थळी पोहोचले. कटिहारच्या कुर्सेला पोलीस स्टेशन हद्दीतील कोशकीपूर येथे लग्नाचा कार्यक्रम होता. त्यासाठी वरात जात असताना वाटेत हा अनर्थ घडला. ज्यामध्ये 8 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान, चांदपूर चौकात मक्याचा ढीग पाहून चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर स्कॉर्पिओ थेट मक्याने भरलेल्या ट्रॅक्टरला जाऊन धडकली. या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय.

लग्नाच्या मंडपात शोककळा

जखमींमध्ये दोन तरुणांचा समावेश आहे. एकाचे नाव उदय कुमार आणि दुसऱ्याचे अभिषेक कुमार असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही सुमारे २५-२६ वर्षांचे असल्याची माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे, मृतांबद्दल अद्याप कुठलीही माहिती उघड झालेली नाही. एसडीपीओ-2 धर्मेंद्र कुमार म्हणाले की, संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. पोलिसही रुग्णालयात पोहोचले आहेत. मृतांची माहिती गोळा केली जात आहे. मात्र अपघाताच्या या बातमीनंतर लग्नाच्या आनंदात शोककळा पसरली आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितली अपघाताचे कारण

एका प्रत्यक्षदर्शी आणि लग्नाच्या पक्षातील एका व्यक्तीने सांगितले की, आम्ही दुचाकीवरून मागे होतो. रस्त्यावर मक्याचा ढीग होता. स्कॉर्पिओ पुढे जात असताना समोर एक ट्रॅक्टर उभा होता. त्यात मक्याचे दाणे भरलेले होते. मक्याच्या कणसाच्या ढिगाऱ्यावर चढल्यानंतर, स्कॉर्पिओ नियंत्रणाबाहेर गेली आणि पार्क केलेल्या ट्रॅक्टरला धडकली. त्या व्यक्तीने पुढे सांगितले की, आम्ही बरहरा कोठी (पूर्णिया) येथील धिब्रा बाजारातून लग्नाच्या समारंभासाठी येत होतो. त्यासाठी आम्हाला कोष्कीपूरला जायचे होते. स्कॉर्पिओमध्ये चालकासह एकूण 10 जण होते. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र नवरदेव या गाडीत नव्हता. या गाडीत फक्त लग्नाचे पाहुणे होते. असेही तो म्हणाला.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.