बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी

लातूर: जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा-तुळजापूर (Latur) महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघाताची (Accident) घटना घडलीय. भरधाव बीएमडब्ल्यू कारने लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागील बाजूने धडक दिली. या घटनेत कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावर शुक्रवारी रात्री 10.15 वाजता तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला. भरधाव बीएमडब्ल्यू कारने ट्रक आणि कंटेनरला जोराची धडक दिली. यात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

सांगली येथील कार (एमएच 04 ईजी 7500) काही कामानिमित्त लातूरला आली होती. काम आटोपल्यानंतर शिवली येथे जेवण केल्यानंतर सहकाऱ्याला सोडण्यासाठी ही कार औशाकडे येत होती. औशानजीक एका हॉटेलसमोर पुढे चाललेल्या लाकडाने भरलेल्या ट्रकला (एमएच 25 यू 0522) आणि एका कंटेनरला (एमएच 12 एफसी 7642) पाठीमागून कारने धडक दिली. त्यानंतर लाकडी ट्रक शंभर फूट पुढे जाऊन उलटला, तर कार पूर्णपणे चक्काचूर होऊन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली. अपघातात मृत्यू झालेले तिघे हे औसा तालुक्यातील बोरगाव (न.) येथील रहिवासी आहेत. चालक धनराज काशीनाथ जाधव (४९, रा. सांगली), आबासाहेब साळुंके (३६), शुभम शेषेराव पाटील (२६), किसन रामलिंग साळुंके (४९, तिघेही रा. बोरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातात जयहिंद विश्वास जाधव (30, रा. औसा) आणि विनायक श्रीकांत हालदर (२८, रा. सांगली) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सांगली येथील धनराज जाधव हे व्यापारी होते. बोरगाव येथील तरुणांच्या मदतीने ते औसा तालुक्यासह जिल्ह्यात व्यवसायाचे जाळे निर्माण करीत होते.

दरम्यान, घटनेची माहिती कळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात हलवले. दरम्यान, अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

कंटेनरच्या धडकेत कामगारांचा मृत्यू

संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील नाथनगर (वडखा) शिवारात दुभाजकाच्या क्रैश बॅरिअर प्लेट बदलताना सुसाट कंटेनरने कामाचे साहित्य घेऊन उभ्या असलेल्या सर्व्हिस ट्रकला धडक दिली. अतिशय वेगामुळे ट्रकच्या आडोशाला जेवणासाठी बसलेल्या तीन कामगारांना चिरडून कंटेनर पुढील जेसीबीवर आदळला. यात चिरडले गेलेल्या तिन्ही कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता हा अपघात घडला.

आणखी वाचा

Comments are closed.