दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराह नाही! माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना गमावला. पुढील सामने जिंकण्यासाठी जसप्रीत बुमराहला संघात राहणे आवश्यक आहे. पण भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे मत आहे की जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धचा पुढील कसोटी सामना खेळणार नाही, जो एजबॅस्टन येथे खेळला जाईल.

माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, ‘बुमराने सांगितले की तो तीन कसोटी सामने खेळू शकतो. आता पुढचा प्रश्न असा येतो की ते कोणते तीन कसोटी सामने खेळणार. मला वाटते की जर त्याला विश्रांती घ्यायची असेल तर तो पुढचा सामना असेल, कारण त्याला निश्चितच लॉर्ड्सवर खेळायचे असेल.’

त्याच्या बोलण्यामागील कारण स्पष्ट करताना शास्त्री यांनी लिहिले की, ‘जर बुमराह एजबॅस्टन कसोटीला वगळला तर तुम्ही तुमच्या वेगवान गोलंदाजाला बरे होण्यासाठी वेळ देऊ शकाल. यामागील आणखी एक कारण म्हणजे लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीमुळे बुमराहला मदत होईल. दुसरीकडे, जर बुमराह एजबॅस्टनवर खेळला तर तो लॉर्ड्सवर खेळणार नाही कारण त्या दोन कसोटी सामन्यांमध्ये फक्त चार दिवसांचे अंतर आहे.’

रवी शास्त्री पुढे म्हणाले की, ‘जर बुमराह पुढचा कसोटी सामना खेळला नाही, तर आपण लॉर्ड्सवर 2-0 ने हरू शकतो. पण त्यांना बुमराहचा वर्कलोड सांभाळावा लागेल.

Comments are closed.