स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप?

नवी दिल्ली : देशातील काही भागांमध्ये छोट्या शहरात आणि ग्रामीण भागात एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसण्याचं संकट निर्माण होऊ शकतं. एटीएम उद्योगातील कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तक्रार पाठवली आहे.  या तक्रारीत स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कॅशचा पुरवठा प्रामुख्यानं मोठ्या शहरांमधील एटीएमसाठी केला जातोय, असा उल्लेख आहे. तर, टिअर-2 आणि  टिअर -3 मधील शहरांमध्ये नोटांचं संकट निर्माण होऊ शकते.

100 कोटींच्या भरपाईची मागणी

CATMI च्या दाव्यानुसार कॅशच्या तुटवड्यानं काही एटीएम बंद पडले आहेत. ज्यामुळं एटीएम ऑपरेटर्सला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. संघटनेनं बँकिंग उद्योगाकडे 100 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. एटीएम बंद राहिल्यानं ऑपरेटर्सला ट्रांझॅक्शन आणि इंटरचेंज फीचं नुकसान सहन करावं लागत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचं  नेटवर्क प्रभावित

द इकनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाशी संबंधित प्रकरण आहे. देशात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचं नेटवर्क 65000 हजार एटीएम इतकं आहे.  यापैकी 50 टक्के एटीएममध्ये रोकड भरण्याचं काम थेट बँकेकडून केलं जातं. बहुतांश महानगरांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये बँकेकडून एटीएममध्ये पैसे भरले जातात. मात्र, छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमधील एटीएममध्ये पुरेशी रक्कम पोहोचत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

CATMI ने SBI नं  20 जून पर्यंत ही समस्या सोडवावी, असं म्हटलं आहे. संघटनेच्या दाव्यानुसार एटीएम नेटवर्क अगोदरपासून तोट्यात आहे. ही स्थिती सुधारली नाही तर एटीएम बंद होण्याची संख्या वाढेल.

एटीएम ऑपरेटर्सपुढं वाढत्या खर्चाचं संकट देखील आहे. काही राज्यात किमान मजुरीत 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढल्यानं खर्च देखील वाढला आहे. दुसीरकडे एटीएममधून पैसे काढण्याचं प्रमाण देखील घटलं आहे. जानेवारी 2023 मध्ये प्रत्येक महिन्यात एटीएममधून पैसे काढण्याच्या व्यवहारांची संख्या 57 कोटी होती. ती सप्टेंबर 2025 मध्ये 43.95 कोटींवर आली आहे.

CATMi च्या माहितीनुसार डिसेंबर 2025 नंतर काही राज्यांमध्ये बँक शाखा आणि करन्सी चेस्टकडून रोख रक्कम मिळवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. संघटनेच्या रिकामं एटीएमध्ये म्हणचे एक एक व्यवहार गमावण्यासारखं आहे.

देशातील एटीएमची संख्या हळू हळू कमी होत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतात एटीएमची संख्या  2.53 लाखांवरुन कमी होऊन 2.51 लाखांवर आली आहे. एटीएमची संख्या कमी होण्याची संख्या ग्रामीण आणि निम शहरी भागांमध्ये अधिक आहे.  जर कॅश तुटवड्याची समस्या लवकर दूर झाली नाही तर छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात एटीएममधून पासे काढण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

हेदेखील वाचा

Comments are closed.