Champions Trophy 2025- टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक; कांगारुंचा 4 गडी राखत पराभव

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील पहिली सेमी फायनल दुबईमध्ये हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झाली. या सामन्यात टीम इंडियाने कांगारुंवर 4 गडी राखत विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडिया आता अंतिम फेरीत पोहचली आहे. टीम इंडियाचा अंतिम सामना दुसऱ्या गटातील न्यूझीलंड-दक्षिण अफ्रिका यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 4 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी टीम इंडियाला 265 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान टीम इंडियाने 4 गडी राखून पूर्ण केलं. यासह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात विराट कोहलीची खेळी निर्णायक ठरली. टीम इडियाने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. 2013 मध्ये जेतेपद, 2017 पाकिस्तानकडून पराभव आणि आता पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड-दक्षिण अफ्रिका यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 264 धावांमध्येच बाद झाला आहे. टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी कमाल दाखवल्याने त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत टीम इंडियाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. परंतु ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी करण्याच्या निर्णयावर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाणी फेरले. टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबुत धाडला. यामध्ये टीम इंडियासाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेल्या ट्रेव्हीस हेडचा (39 धावा) सुद्धा समावेश आहे. वरुन चक्रवर्तीने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधर स्टीव्ह स्मिथचा (73 धावा) मोहम्मद शमीने त्रिफळा उडवला. तसेच मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या अॅलेक्स कॅरीला (61 धावा) श्रेयस अय्यरने धावबाद केले. यांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 264 धावांमध्ये तंबुत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने 4 गडी राखत हे लक्ष्य पूर्ण केले.
Comments are closed.