Chandrashekhar Bawankule appeals to Sudhakar Badgujar, who joined BJP, to resolve differences


मंगळवारी (ता. 17 जून) सुधाकर बडगुजर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा उपस्थित होते.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आज मंगळवारी (ता. 17 जून) भाजपामध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला. बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाची काही माहिती असे सांगणारे बावनकुळे हा पक्ष प्रवेश उद्या किंवा परवा होणार, याची माहिती होती, असे म्हणून केलेल्या विधानावर पडदा टाकताना यावेळी पाहायला मिळाले. पण बडगुडर यांनी भाजपामध्ये प्रवेश करताच बावनकुळेंकडून त्यांना सूचना वजा आवाहन करण्यात आले आहे. मतभेद आहेत पण मनभेद नाही, पण मतभेद दूर करणे गरजेचे आहे. प्रवेश झाला आहे, त्यामुळे आता ते मतभेदही दूर करा, असे बावनकुळेंकडून यावेळी बडगुजर यांना सांगण्यात आले. (Chandrashekhar Bawankule appeals to Sudhakar Badgujar, who joined BJP, to resolve differences)

सुधाकर बडगुजर यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, पक्षात मनभेद नाहीत, मतभेद आहेत ते दूर होईल याचा विश्वास आहे. कोणी एखाद्या पक्षात असतो तेव्हा तो वाढवण्यासाठी पुढे जात असतो. कधी शिंतोडे उडवतो. मात्र, आता जबाबदारी आहे की जुन्या नव्यांना घेऊन पुढे जायचे आहे. ज्या पक्षाला आयुष्य देतो तिथे अपमान होत असेल आणि काळजी होत नसेल तर बरोबर नाही. पण आता मतभेद आहेत, पण मनभेद नाही, पण जे मतभेद आहेत, ते दूर करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता या प्रवेशानंतर जे मतभेद आहेत, ते सुद्धा करावे. ज्या पक्षात आपण असतो तिथली भूमिका मांडणे गरजेचे असते, त्यामुळे बडगुजर यांनी याआधी आपली भूमिका मांडली. पण आता ते पक्षासाठी काम करतील आणि गिरीश महाजन म्हणाले त्याप्रमाणे 100 हून अधिक जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिंकून आणतील, असे यावेळी बावनकुळेंनी म्हटले.

हेही वाचा… Chandrashekhar Bawankule : मला वाटले की… बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाबाबत बावनकुळेंचे स्पष्टीकरण

तसेच, आता अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश इथे घेता आला नाही. त्यामळे येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये नाशिकमध्ये मोठा मेळावा घेऊन जे राहिले आहेत त्यांचा पक्षप्रवेश करुयात. भाजपा तुमची प्रतिष्ठा कधीही कमी होऊ देणार नाही. पक्षात कधी वाटणार नाही, की नवीन घरात गेलो आहोत. हा परिवार आहे, भाजपामध्ये सर्वजण परिवार म्हणून काम करतात. काही काळापुरते जरी मतभेद असतील, काही मनभेद असतील तर ते आपण सर्वांनी मिळून दूर करण्याचे प्रयत्न करू. त्यामुळे आता जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करत सर्वांनी नीट राहावे इतकीच विनंती करतो, असे यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटले आहे.



Source link

Comments are closed.