IPL: आरसीबीला सर्वाधिक वेळा हरवणारे संघ, कोणता संघ पहिल्या स्थानी?

यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरूवात (22 मार्च) पासून होणार आहे. शुभारंभ सामन्यातच गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB) होणार आहे. तत्पूर्वी जेव्हा जेव्हा आयपीएलमधील सर्वात मोठ्या संघांची चर्चा होते तेव्हा त्यात आरसीबीचे नाव निश्चितच घेतले जाते. जरी या संघाने अद्याप ट्रॉफी जिंकली नसली तरी, संघाचा चाहता वर्ग अजूनही खूप मजबूत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दिग्गज विराट कोहली (Virat Kohli), जो सुरुवातीपासूनच या संघाचा भाग आहे. पण या बातमीद्वारे आपण त्या 3 संघांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा आरसीबीला पराभूत केले आहे.

1) चेन्नई सुपर किंग्ज (21 वेळा)- आयपीएलमध्ये, चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आरसीबीला सर्वाधिक वेळा पराभूत केले आहे. सीएसकेने 21 वेळा आरसीबीचा धुव्वा उडवला आहे. दोन्ही संघांमध्ये 33 सामने खेळले गेले आहेत आणि या काळात सीएसकेने 21 सामने आणि आरसीबीने 11 सामने जिंकले आहेत. यादरम्यान एक सामना अनिर्णित राहिला आहे.

2) कोलकाता नाईट रायडर्स (20 वेळा)- आरसीबीने आतापर्यंत केकेआरविरुद्ध 34 सामने खेळले आहेत. या काळात त्यांनी 14 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, केकेआर संघ 20 सामने जिंकण्यात यशस्वी झाला आहे.

3) मुंबई इंडियन्स (19 वेळा)- या यादीत मुंबई इंडियन्स (MI) संघ तिसऱ्या स्थानावर आहे, जो 5 वेळा विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला आहे. जेव्हा जेव्हा आरसीबी आणि एमआयचे संघ मैदानावर आमने-सामने येतात तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे असते. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत आरसीबी आणि मुंबई इंडियन्समध्ये 33 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान एमआयने 19 सामने जिंकले आहेत, तर आरसीबी संघ 14 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

Comments are closed.