CM Devendra Fadnavis indicative statement regarding farmer loan waiver


राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. हे आश्वासनाबाबत महायुतीच्या जाहीरनाम्यातही लिहिण्यात आले होते. पण आता या सरकारला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत अलेला असतानाही अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही.

पुणे : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. हे आश्वासनाबाबत महायुतीच्या जाहीरनाम्यातही लिहिण्यात आले होते. पण आता या सरकारला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत अलेला असतानाही अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, याकरिता शेतकरी संघटनांनी आंदोलने केली. माजी आमदार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्यागही केले. पण सरकारकडून केवळ हो आम्ही कर्जमाफी देऊ, असे सांगण्यात येत आहे. पण आता या कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. सरकार कर्जमाफीबाबत एकही शब्द फिरवणार नाही, असे फडणवीसांनी म्हटले आहे. (CM Devendra Fadnavis indicative statement regarding farmer loan waiver)

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीज आज शनिवारी (ता. 21 जून) योग दिनाच्या निमित्ताने पुण्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी वारकरी आणि पुणेकरांसोबत योगासने केली. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारणा करण्यात आली. याबाबत प्रतिक्रिया देत फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात अतिशय सविस्तर सांगितले की, कर्जमाफी करायची यासंदर्भातील काही नियम आहेत. त्यासंदर्भात एक पद्धत आहे. पण या कर्जमाफीबाबत सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. योग्यवेळी हा निर्णय सुद्धा राज्य सरकार निश्चितपणे घेईल. त्यामुळे फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योग्य वेळ नेमकी कधी येणार? आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी कधी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा.. Nana Patole : मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून…; निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयावर पटोलेंचा निशाणा

महत्त्वाची बाब म्हणजे, महिन्याभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिले? मी दिले आहे का? मी तरी दिलेलं नाही, असे म्हणत हात वर केले होते. ज्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले होते. त्यामुळे महायुती सरकारला कर्जमाफीबाबत निर्णय घ्यायचा आहे की नाही, असा प्रश्न शेतकरी संघटनांकडून विचारण्यात आला होता. पण शेतकरी कर्जमाफी देण्यात येणारच असे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यामुळे महायुतीच शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून एकवाक्यता नसल्याचे पाहायला मिळाले. राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही, असे विधान काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनी केले होते, पण आता पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी सकारात्मकता दाखवल्याने कर्जमाफी होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.



Source link

Comments are closed.