नवऱ्याला थंड काळजानं संपवलं, राजाच्या पिंडदानानंतर सोनमचा भाऊ म्हणाला,’नातं आधीच कळलं असतं तर..
राजा राघुवानी खून प्रकरण: इंदौरमधील उद्योजक राजा रघुवंशी यांच्या हत्येनं देशभरात खळबळ उडवली आहे. लग्नानंतर केवळ 10 दिवसांत पत्नी सोनम हिनं मेघालयातील हनिमून ट्रिपमध्येच पतीचा काटा काढला. या हत्येप्रकरणी मोठे खुलासे झाले असून, या खुनाचा कट त्यांची पत्नी सोनम रघुवंशी हिने आपल्या प्रियकरासोबत रचल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे, पतीचा जीव घेतल्यानंतर सोनम गाझीपूरमधील एका ढाब्यावर सापडली आणि अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या प्रकरणात आता तिच्या भावाने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. या प्रकरणात तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि अन्य तिघांना अटक झाली आहे.
दरम्यान, उज्जैनमध्ये राजा यांचं पिंडदान पार पडलं. या विधीला सोनमचा सख्खा भाऊही उपस्थित होता. राजाच्या पिंडदानानंतर सोनमच्या भावाचं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. तो म्हणालाय, “हे नातं आधीच कळलं असतं, तर मीच त्यांचं लग्न लावून दिलं असतं… पण आता दोषी आढळली, तर तिला फाशी द्यायला हवी!” (Crime News)
नक्की प्रकरण काय?
राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचं लग्न 11 मे रोजी थाटात पार पडलं. मात्र अवघ्या 10 दिवसांत दोघं हनिमूनसाठी शिलाँगला गेले आणि तिथेच राजा यांचा संशयास्पद मृत्यू झाला. 23 मे रोजी मेघालयातील ईस्ट खासी हिल्स परिसरात राजा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली. तपास करत असतानाच पोलिसांनी सोनमवर संशय घेतला आणि या हत्येच्या कटात तिचा प्रियकर राज कुशवाहा, तसेच विशाल चौहान, आनंद कुर्मी आणि आकाश राजपूत यांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
राजाच्या पिंडदान विधीनंतर सोनमचा भाऊ म्हणाला..
राजा रघुवंशी यांचा पिंडदान विधी शुक्रवारी उज्जैनमधील क्षिप्रा नदीच्या तीरावर त्यांच्या भावंडांनी सचिन आणि विपिन यांनी पार पाडला. विशेष म्हणजे, या विधीला सोनम रघुवंशी हिचा भाऊ गोविंदही उपस्थित होता. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना त्याने सांगितलं, “माझ्या बहिणीचं आणि राजचं नातं मला लग्नाआधी माहीत असतं, तर मीच त्यांचं लग्न लावून दिलं असतं किंवा तिला पळून जाऊ दिलं असतं.” पुढे तो म्हणाला, “आज मी राजा यांच्या कुटुंबासोबत आहे. ते माझ्या भावासारखेच आहेत. सोनम दोषी आढळली, तर तिला फाशी व्हायलाच हवी.”
गोविंदने सोनमविषयी बोलताना तिला “हट्टी आणि चटकन रागावणारी” असं म्हटलं. “आम्ही तिच्यावर कधीही जबरदस्ती केली नव्हती. तिला जर लग्न नको होतं, तर तिनं स्पष्ट सांगायला हवं होतं. पण तिनं जे केलं, ते माफ करता येण्यासारखं नाही. तिनं केवळ आमचं नव्हे, तर संपूर्ण मध्य प्रदेशाचं नाव खराब केलं आहे.” राजाचा भाऊ विपिननं सांगितलं, “गोविंद आमच्याशी संपर्कात होता. आम्ही त्याला स्पष्ट सांगितलं की, समारंभाला यायचं असेल तर ये. कारण चूक त्याच्या बहिणीची होती.”
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.