DCM Eknath Shinde neglated Raj and Uddhav Thackeray alliance discusions
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येणार का? याची चर्चा महाराष्ट्रभर रंगली आहे. अशामध्ये दोन्ही पक्षांकडून अप्रत्यक्षपणे एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. यावरून शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारला असता आधी त्यांनी उत्तर देण्यात टाळाटाळ केली. मात्र वारंवार प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “आमची महायुती मजबुतीने लढणार आणि मजबुतीनेच जिंकणार,” असे म्हणत त्या प्रश्नाला बगल दिली. आता यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. (DCM मराठी neglated Raj and Uddhav Thackeray alliance discusions)
हेही वाचा : UPSC : पूजा खेडकर प्रकरणानंतर युपीएससीचा मोठा निर्णय; फसवणूक टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनीही घेतला पुढाकार
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका मंडळी नसताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीसंदर्भात बोलताना, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केले. त्यामुळे आत्ता दोन्ही पक्ष एकत्र येणार का? यावर आता जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
क्रेडाईचा कार्यकारी समारंभ आणि सर्वसाधारण सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (6 जून) पुण्यात आले होते. यावेळी पुण्यामधील रस्ते आणि स्थानिक प्रश्नांवर पत्रकारांना उत्तरे दिली. तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी भाष्य केले. महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुका लढलो, महायुती म्हणूनच आम्ही विधानसभा जिंकलो आणि गेल्या अडीच वर्षांच्या कामाची पावती लोकांनी आम्हाला दिली आहे,” असे ते यावेळी म्हणाले. दरम्यान, “मी आज माझी सगळी टीम घेऊन आलो आहे, कोणीतरी आता मला म्हणाले की लवकर निर्णय घेणारा मंत्री आहे. कोणतेही कारणे न देता जागच्या जागी निर्णय घेण्याची (No reason on the spot decision) माझी पद्धत आहे, असे यावेळी ते म्हणाले. मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आम्ही एकत्र टीम म्हणून काम करतो. ज्या कामांना स्थगिती देण्यात आली त्यांना आम्ही चालना दिली.” असे ते म्हणाले.
Comments are closed.