Devgad News एसटी बस व रिक्षाची जोरदार धडक, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना सायंकाळी 3.45 वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षा व्यावसायिकाचा समावेश आहे.

मृत व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे आहेत: संकेत सदानंद घाडी (वय 35, आचरा वरचीवाडी), संतोष रामजी गावकर (वय 35, आचरा गाऊडवाडी), रोहन मोहन नाईक(वय 35, आचरा गाऊडवाडी) आणि सोनू कोळंबकर (वय 45,आचरा पिरावाडी). या चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी गोवा येथील बांभुळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

विजयदुर्ग-मालवण मार्गावर धावणारी एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यात रिक्षातील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमधील संकेत घाडी यांनी केवळ पंधरा दिवसांपूर्वी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.या दुर्घटनेमुळे संपूर्ण आचरा गावावर शोककळा पसरली आहे.आचरा येथील रिक्षा व्यावसायिक या दुर्दैवी घटनेने प्रचंड हादरले आहेत. ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून गावात शोकाकुल वातावरण आहे.

Comments are closed.