1 जुलैपासून अमरनाथ यात्रा मार्गावर ड्रोनने बंदी घातली

सरकारकडून ‘नो फ्लाय झोन’ घोषित : सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घेतला निर्णय

वृत्तसंस्था/ जम्मू

अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने पूर्ण यात्रामार्गाला ‘नो फ्लाय झोन’ घोषित केले आहे. हा निर्णय पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. याच्या अंतर्गत अमरनाथ यात्रेच्या पहलगाम आणि बालटालच्या दोन्ही मार्गांवर सर्वप्रकारची हवाई उपकरणे-ड्रोन, युएव्ही आणि फुग्यांवर बंदी असणार आहे. हा निर्णय 1 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत प्रभावी असणार आहे. तर यात्रा 3 जुलैपासून 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

परंतु बंदीचा हा निर्णय वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, आपत्ती व्यवस्थाप आणि सुरक्षा दलांकडून करण्यात येणाऱ्या देखरेख उ•ाणांवर लागू होणार आहे. याकरता एक वेगळी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) लवकरच जारी करण्यात येणार आहे.

अमरनाथ यात्रेचे दोन मार्ग

पहलगाम मार्ग : या मार्गावरुन गुहेपर्यंत पोहोचण्यास 3 दिवस लागतात, परंतु हा मार्ग सोपा आहे. यात्रेत फारशी मोठी चढाई नाही, पहलगामहून पहिला थांब चंदनवाडी आहे. हे बेस कॅम्पपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. येथूनच चढाई सुरू होते. 3 किमीच्या चढाईनंतर यात्रा पिस्सू टॉपवर पोहोचते, येथून पायी चालत संध्याकाळपर्यंत यात्रा शेषनाग येथे पोहोचते. हा प्रवास सुमारे 9 किलोमीटरचा आहे. दुसऱ्या दिवशी शेषनाग येथून भाविक पंचतरणी येथे जातात, हे शेषनागपासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर आहे. पंचतरणी येथून पवित्र गुहा केवळ 6 किलोमीटर अंतरावर आहे.

बाल्टल मार्ग: यात्रा कमी वेळेत पूर्ण करत बाबा बर्फानीच्या दर्शन घेण्यासाठी बालटाल मार्ग सर्वात उपयुक्त आहे. यात केवळ 14 किलोमीटरची चढाई करावी लागते, परंतु काहीशी सरळ चढाई आहे. याचमुळे वृद्धांना या मार्गावर समस्या होते. तसेच या मार्गावर अरुंद आणि धोकादायक वळणे आहेत.

यंदा विशेष व्यवस्था

भाविकांच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदाच जॅमर लावण्यात आले असून ज्याला केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सुरक्षा प्रदान करणार आहे. सशस्त्र दलांच्या 581 तुकड्या यात्रेच्या सुरक्षेकरता तैनात केल्या जाणार आहेत. जवळपास 42000 ते 58000 जवान तैनात असणार आहेत. यात्रामार्गावर भाविकांच्या सुरक्षेसाठी 156 तुकड्या यापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होत्या, तर 425 नव्या तुकड्यांना लवकरच तैनात केले जाणा आहे. भाविकांना खांद्यावर घेत नेणाऱ्या पोनीवाल्यांची पडताळणी केली जाणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले पोनी/पिट्ठू सेवा पुरविणाऱ्यांना अनुमती दिली जाणार नाही. तर भाविकांसाठी वापरण्यात येणाऱ्या घोडे-खेचरांचे टॅगिंग करण्यात आले आहे. जेणेकरून मार्गावरून हटल्यावर त्यांना रियल टाइममध्ये ट्रॅक करता येऊ शकेल. रोड ओपनिंग पार्टी, धोक्याच्यास्थितीत त्वरित कारवाईसाठी शीघ व्रृती दल, बॉम्ब विरोधी पथक, के9 युनिट्स (विशेष स्वरुपात प्रशिक्षित श्वान) आणि ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे.

यात्रेवर यापूर्वी दहशतवादी हल्ले

अमरनाथ भाविकांवर यापूर्वी अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. ऑगस्ट 2000 मध्ये नुनवान बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 32 जणांना जीव गमवावा लागला होता. तर जुलै 2001 मध्ये दहशतवाद्यांनी शेषनाग बेस कॅम्पवर हल्ला केला होता, या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता. 2002 साली चंदनवाडी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 11 भाविक मारले गेले होते. जुलै 2017 मध्ये कुलगाम जिल्ह्यात अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर हल्ला झाला होता, यात 8 जणांना जीव गमवावा लागला होता.

Comments are closed.