Farm Loan Waiver: Sachin Sawant targets Fadnavis


कर्जमाफीसाठी उचित आणि योग्य वेळ कोणती, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे. त्याचबरोबर कर्जमाफी करण्यासाठी कोणते नियम आणि पद्धती आहेत? तेही शेतकरी बांधवांना सांगावे.

(Farm Loan Waiver) मुंबई : राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गाजत आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले वचन कधी पूर्ण करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, याकरिता शेतकरी संघटनांनी आंदोलने केली. तर, माजी आमदार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनही केले. या पार्श्वभू्मीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, योग्यवेळी हा निर्णय राज्य सरकार निश्चितपणे घेईल, असे उत्तर दिले. यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. शब्द फिरविणे हा मुख्यमंत्र्यांचा छंदच असल्याची टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. (Sachin Sawant targets Fadnavis)

निवडणुकीपूर्वी महायुतीने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभेत टर्निंग पॉइंट ठरली. त्याचप्रमाणे, शेतकरी कर्जमाफीचीही घोषणा करण्यात आली होती. परंतु महिन्याभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिले? मी दिले आहे का? मी तरी दिलेले नाही, असे म्हणत हात झटकले होते. कर्जमाफी देण्यासारखी राज्य सरकारची परिस्थिती नाही, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी फडण्याचा सल्ला दिला होता. याच प्रश्नावर माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते.

हेही वाचा – Politics : कोणी कितीही मिठाचा खडा टाकला तरी…; सेना-मनसे युतीवर काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

मुख्यमंत्री फडणवीज शनिवारी योग दिनाच्या निमित्ताने पुण्यात उपस्थित होते. यावेळी वारकरी आणि पुणेकरांसोबत त्यांनी योगासने केली. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी कर्जमाफीबाबत विचारणा करण्यात आली असता, ते म्हणाले की, कर्जमाफी करण्यासंदर्भात काही नियम आहेत. त्यासंबंधी एक पद्धत आहे. पण या कर्जमाफीबाबत दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. योग्यवेळी हा निर्णय सुद्धा राज्य सरकार निश्चितपणे घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तथापि, ठोस उत्तर न दिल्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. कर्जमाफीसाठी उचित आणि योग्य वेळ कोणती, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे. त्याचबरोबर कर्जमाफी करण्यासाठी कोणते नियम आणि पद्धती आहेत? तेही शेतकरी बांधवांना सांगावे. तसेच, जाहिरनाम्यात योग्य आणि उचित वेळ कोणती? ते का सांगितले नाही? याचेही उत्तर दिले पाहिजे, असे सांगतानाच, जनतेला फसविण्यात भाजपाचा हातखंडा आहे, हे गेली अनेक वर्षे स्पष्ट झाले आहे आणि शब्द फिरविणे हा मुख्यमंत्र्यांचा छंदच आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा – Thackeray on Farmers Loan : हा बोलबच्चनगिरीचा कळस, ठाकरेंच्या निशाण्यावर फडणवीस



Source link

Comments are closed.