बालीला उड्डाण दिल्लीला परतते

मात्र, तांत्रिक समस्येमुळे नव्हे, तर ज्वालामुखीमुळे

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीहून इंडोनेशियातील बाली येथे जाणारे एअर इंडियाचे प्रवासी विमान पुन्हा दिल्लीला परतविण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय विमानात काही तांत्रिक समस्या होती, म्हणून नव्हे, तर बालीच्या जवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने घेतला गेला आहे, असे एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने बुधवारी घोषित केले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये, विशेषत: अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातानंतर एअर इंडियाची अनेक विमाने एकतर रद्द करण्यात आली आहेत, किंवा ती मागे परतविण्यात आली आहे. या विमानांमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड तपासणीत दिसून आलेला नाही. मात्र, केवळ दक्षतेचा एक उपाय म्हणून असे करण्यात आल्याचेही स्पष्टीकरण व्यवस्थापनाने बुधवारी पत्रकारांसमोर केले.

यावेळी मात्र वेगळे कारण

दिल्लीहून बालीला निघालेले एअर इंडियाचे विमान इंडोनेशियापर्यंत पोहचल्यानंतर त्याला माघारी फिरण्याचा संदेश देण्यात आला होता. त्यामुळे हे विमान पुन्हा दिल्लीला सुखरुप पोहचले. या विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. हे विधान तांत्रिक कारणांमुळे नव्हे, तर इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने परतविण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

83 विमाने रद्द किंवा परत

अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेनंतर आतापर्यंत एअर इंडियाची 83 विमान उ•ाणे एकतर रद्द करण्यात आली आहेत, किंवा ती परतविण्यात आली आहेत. त्यांच्यापैकी 66 विमाने ही बोईंग 787 प्रकारची आहेत. ही माहिती नागरी विमान वाहतूक प्राधिकारणाने (डीजीसीए) बुधवारी दिली आहे. तथापि, या घटनाक्रमाचा मोठा विपरित परिणाम नागरी विमान वाहतूक व्यवसायावर झाल्याचे दिसून आलेले नाही. नागरीकांचा विमान प्रवासावरील विश्वास उडू नये, याची दक्षता विमान कंपन्या घेत आहेत. जी विमाने परतविण्यात आली आहेत ती आपल्या मूळच्या स्थानी सुखरुप परत आली आहेत. एअर इंडियाच्या विमानांमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाड असल्याचे सखोल तपासणीनंतरही आढळून आलेले नाही. मात्र, जराही शंका असली तरी विमानाची उ•ाणे रद्द करावी लागत आहेत. प्रवाशांचे नीतीधैर्य राखले जावे, यासाठी असे करावे लागेल, अशी माहिती आहे.

Comments are closed.