Gadchiroli News – मॉर्निंग वॉकला गेलेल्या मुलांना भरधाव ट्रकनं चिरडलं; चौघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

गडचिरोलीमध्ये भीषण अपघात झाला आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या मुलांना भरधाव ट्रकने चिरडले असून यात चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. गडचिरोली-नागपूर महामार्गावरील काटली येथे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काटली गावातील 6 मुलं पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली. रस्त्यावर व्यायाम करत असतानाच भरधाव वेगात आलेल्या ट्रकने मुलांना चिरडले. यात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांनी गडचिरोलीच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. अन्य दोन मुलांना प्राथमिक उपचारानंतर नागपूरला हलवण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Comments are closed.