IND vs ENG: सौरव गांगुलींचा मोठा सल्ला, इंग्लंडमध्ये विजयासाठी टीम इंडियाला दिले मार्गदर्शन!
हेडिंग्ले कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली, पण गोलंदाजी आणि फील्डिंग खूप निराशाजनक राहिली. त्यानंतर दुसऱ्या डावात टीम(Team india) इंडियाच्या फलंदाजीने सुद्धा निराश केले. यामध्येच भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jusprit Bumrah) त्याच्या शानदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. या यादीमध्ये माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांचे देखील नाव सामील आहे. त्यासोबतच माजी बीसीसीआय अध्यक्ष यांनी टीम इंडियाला जिंकण्याचा सल्ला दिलेला आहे.
भारतीय संघाच्या 471 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ 465 धावांवर ऑल आऊट झाला. गोलंदाजी करताना टीम इंडियासाठी फक्त जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली. बाकीच्या सर्व गोलंदाजांनी निराश केले. बुमराहने 5 विकेट्स घेतल्या, प्रसिध्द कृष्णाने 2 तर मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या. माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे, बुमराहला तिन्ही फॉरमॅटमध्ये गोलंदाजी करताना पाहणे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आशा आहे की, त्याला बाकीचे गोलंदाज देखील पाठिंबा देतील आणि त्यांचा खेळ देखील सुधरवतील. ज्यामुळे तो 5 ही कसोटी सामने खेळू शकेल, यामुळे भारत मालिकेत टिकून राहील.
टीम इंडिया जेव्हा इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली, तेव्हा वेगवान गोलंदाजी खूप मजबूत दिसत होती. आयपीएल 2025 मध्ये शानदार प्रदर्शन केलेल्या प्रसिद्ध कृष्णा (Prasiddh Krishna) आणि मोहम्मद सिराजकडून (Mohmmed Siraj) सुद्धा चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. पण पहिल्याच सामन्यात या दोन्ही गोलंदाज म्हणाव्या त्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसले नाहीत. शार्दुल ठाकूर (Shardul thakur) तर पार्ट टाइम गोलंदाज दिसत होता, तसेच रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सुद्धा त्याच्या मूळ अंदाजात दिसला नाही. ज्याच्या कारणाने गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहवर एकट्यावर खूप जबाबदारी आणि दबाव दिसत होता. मालिका जिंकण्यासाठी जसप्रीत बुमराहला बाकीच्या गोलंदाजांची साथ मिळणे खूप महत्त्वाचे आहे.
Comments are closed.