IND vs ENG: उर्वरित 4 सामन्यात जसप्रीत बुमराह कधी खेळणार? गौतम गंभीरने स्पष्टच सांगितले
भारत वि इंग्लंड कसोटी मालिका: भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका 20 जूनपासून सुरू झाली. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला, परिणामी 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 0-1 ने पिछाडीवर आहे. आता दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळला जाईल. या मालिकेच्या सुरुवातीलाच जसप्रीत बुमराहने भारतीय संघाची चिंता वाढवली होती. खरं तर, जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धचे सर्व कसोटी सामने खेळणार नाही हे आधीच निश्चित झाले होते. आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बुमराहच्या खेळण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यानंतर पत्रकार परिषदेत गौतम गंभीर यांना विचारण्यात आले की, जसप्रीत बुमराह उर्वरित 4 सामन्यांमध्ये कधी खेळेल आणि कधी नाही. यावर उत्तर देताना गौतम गंभीर म्हणाले, “त्याचा वर्कलोड सांभाळणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण पुढे आम्हाला खूप क्रिकेट खेळायचे आहे आणि बुमराहचे संघात काय महत्त्व आहे, हे आम्हाला माहीत आहे.”
गौतम गंभीर यांनी सांगितले, “हे आधीच ठरले होते की, बुमराह मालिकेतील फक्त 3 कसोटी सामनेच खेळेल. त्याचे शरीर तंदुरुस्त वाटते की नाही हे पाहावे लागेल. तो उर्वरित कोणते 2 कसोटी सामने खेळेल हे आम्ही अजून ठरवले नाही.”
जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत मिळून 43.4 षटके गोलंदाजी केली होती. संपूर्ण सामन्यात त्याने एकूण 5 विकेट्स घेतल्या आणि याव्यतिरिक्तही विकेट्सच्या अनेक संधी निर्माण केल्या होत्या.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
दुसरा सामना (2-6 जुलै) बर्मिंगहॅम
तिसरा कसोटी (10-14) जुलै लॉर्ड्स
चौथा सामना (23-27) जुलै मँचेस्टर
पाचवा सामना (31 जुलै ते 4 ऑगस्ट) लंडन/केनिंग्टन ओव्हल
Comments are closed.