फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, नेमकं काय


आयएनडी वि पाक एशिया कप 2025 अंतिम करंडक: भारतीय संघाने (Team India) अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया चषकावर (Asia Cup 2025 Final 2025 Trophy) नाव कोरलंय. तिलक वर्मा (Tilak Verma) भारताच्या विजयाचा हिरो ठरला. रिंकू सिंहने (Rinku Singh) अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय पक्का केला. विजयासह सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली आहे.

भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या आशिया चषकाच्या फायनलइतकाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळाही तितकाच नाट्यमय ठरला. कारण आशियाई क्रिकेट कौन्सिल म्हणजे एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला. एसीसीनं आपल्याला ही माहिती दिल्याचं सांगून समालोचक सायमन डूल यांनी पारितोषिक वितरण सोहळा थोडक्यात गुंडाळला.

भारतीय खेळांना उतार करण्याची परवानगी नाही- (टीम इंडियाने महाविद्यालय नाकारले

आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघाला विजयी ट्रॉफी मिळाली नाही. ट्रॉफी न घेता भारतीय खेळाडूंनी अखेर सेलिब्रेशन केले. भारतीय संघाचे कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं उपविजेतेपदाचा धनादेश एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते स्वीकारला. मात्र भारतीय खेळाडूंनी मोहसिन नकवींच्या हस्ते विजेतेपद स्वीकारण्यास नकार दिला. तसेच शेवटपर्यंत त्या भूमिकेवर कायम राहिले. त्यामुळे मोहसिन नकवी यांचा चेहरा बक्षीस समारंभावेळी पडला होता.

नेमकं काय घडलं? (Ind vs Pak Final What happened?)

एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही आहेत. त्यामुळंच भारतीय संघानं मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. भारतीय संघाच्या या जिद्दानंतरही मोहसीन नक्वी देखील ट्रॉफी देण्यासाठी हट्ट करत होते. त्यानंतर ट्रॉफी न घेण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला. शेवटपर्यंत भारतीय संघाने ट्रॉफी घेतली नाही. अखेर ट्रॉफी न घेताच भारतीय संघाने सेलिब्रेशन केले. त्यानंतर मोहसीन नक्वी मैदानातून ट्रॉफी घेऊन निघून गेले. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं. तसंच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळं आशिया चषकाचा पारितोषिक वितरण सोहळा तासभरापेक्षा उशिरानं सुरु झाला. तेवढा वेळ मोहसीन नक्वी हे एकटेच व्यासपीठावर उपस्थित होते. पाकिस्तान संघही जवळजवळ 55 मिनिटं ड्रेसिंगरूममध्येच बसून होता.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (What Suryakumar Yadav Say?)

मी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून, क्रिकेट फॉलो करायला सुरुवात केल्यापासून असा प्रसंग मी कधीच पाहिलेला नाही की विजेत्या संघाने ट्रॉफी नाकारली आहे. तेही अशी ट्रॉफी जी जिंकण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत केली आणि सहजासहजी मिळालेली नाही. ही स्पर्धा जिंकणं आमच्यासाठी खूप कठीण होतं. आम्ही 4 तारखेपासून इथे होतो, सलग दोन उत्कृष्ट सामने खेळलो. मला वाटतं आम्ही यासाठी पात्र होतो. यापेक्षा जास्त काही मी सांगू शकत नाही, कारण मी सगळं एका वाक्यात सांगून टाकलंय. माझ्यासाठी खरी ट्रॉफी म्हणजे आमच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेले सर्व खेळाडू आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफ आहेत. हाच तो खरा खजिना आहे, आणि हीच खरी ट्रॉफी आहे, ज्या गोड आठवणींसारख्या माझ्यासोबत कायम राहतील, असं सूर्यकुमार यादवने सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=vbshgpmhb2c

संबंधित बातमी:

Ind vs Pak Final Asia Cup 2025 : ‘त्या’ पाकिस्तानीच्या हस्ते आम्हाला ट्रॉफी नको, टीम इंडियाची भूमिका, भारताच्या विजयानंतर दुबईत मध्यरात्री मोठा ड्रामा! PM मोदींच ट्विट व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.