पाकिस्तानच्या खेळाडूकडून गोळीबाराची ॲक्शन करत मैदानात सेलिब्रेशन; कोण आहे साहिबझादा फरहान?
आयएनडी वि पाक एशिया कप 2025 साहिबजादा फरहान: इंड. पाक एशिया कप 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला.
𝗔 𝗰𝗹𝗶𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝘄𝗶𝗻 𝗶𝗻 𝘁𝗵𝗲 𝗯𝗮𝗴 𝗶𝗻 #𝗦𝘂𝗽𝗲𝗿𝟰! 🙌#Teamindia मध्ये त्यांची जिंकण्याची धाव सुरू ठेवा #Asiacup2025! 👏 👏
स्कोअरबोर्ड ▶ ️ https://t.co/cnzdx2hkll pic.twitter.com/mdqrfgfdrs
– बीसीसीआय (@बीसीसीआय) 21 सप्टेंबर, 2025
दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने (Sahibzada Farhan) केलेल्या कृत्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावताच बॅटनं AK 47 प्रमाणे गोळीबाराची ॲक्शन केली. साहिबजादा फरहानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर भारतीयांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येतोय. AK 47 प्रमाणे गोळीबाराची ॲक्शन करणारा साहिबजादा फरहान नेमका कोण आहे?, जाणून घ्या…
शेवटच्या सामन्यात भारताचा कर्णधार सशस्त्र सैन्याने क्रिकेटमध्ये आणला. आजच्या सामन्यात आता पाकिस्तानी खेळाडू परतफेड करतात. क्रिकेटमध्ये राजकारण आणणे ही एक दुहेरी तलवार आहे. #Indvpak pic.twitter.com/tzl2qxgpy8
– 𝕌ℕ𝔼𝕋𝔼𝔻 🇮🇳 𝕀ℕ𝔻𝕀𝔸 (@a48cbb7b672c40c) 22 सप्टेंबर, 2025
कोण आहे साहिबझादा फरहान? (Who is Sahibzada Farhan?)
साहिबझादा फरहानचा जन्म 3 मार्च 1996 रोजी पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा येथे झाला. साहिबझादा फरहान पाकिस्तानचा आक्रमक शैलीत खेळणारा उजव्या हाताचा सलामी फलंदाज आहे. साहिबझादा फरहान स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवले. साहिबझादा फरहान प्रामुख्याने पाकिस्तानसाठी T20 फॉरमॅटमध्ये खेळतो. जुलै 2018 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध साहिबझादा फरहानने टी-20 मध्ये पदार्पण केले.
साहिबझादा फरहान कारकीर्द-
1. फर्स्ट क्लास: 70 हून अधिक सामने, 4000 हून अधिक धावा
2. लिस्ट-ए: 50 हून अधिक सामने, 1800 हून अधिक धावा
3. आंतरराष्ट्रीय टी-20: 90 हून अधिक सामने, 2000 हून अधिक धावा
साहिबझादा फरहान सेलिब्रेशनवर संजय राऊतांच्या हल्लाबोल-
साहिबझादा फरहानने अर्धशतक करताच मैदानात AK 47 प्रमाणे बॅट धरुन गोळीबाराची अॅक्शन केली. पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले हेच त्याच्या कृतीतून दाखवत होता. बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे. भारताचे लष्कर आणि पुलवामा पहलगाममध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह महान आहेत, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला.
संबंधित बातमी:
इंडियन वि पॅक असिया कप आता हॅरिस रौतेनीही दिव्चलान, मला जमिनीवर माहित नाही, जमिनीत गाठ,
आणखी वाचा
Comments are closed.