टीम इंडियाने विजयाचा गुलाल उधळला; आशिया कपमध्ये भारताच्या लेकींनी पाकिस्तानला धूळ चारली
भारत अ ने पाकिस्तान अ महिला रायझिंग स्टार्स आशिया चषक 2026 चा पराभव केला: आज क्रिकेट विश्वाचे लक्ष कोलंबोकडे लागलेले असतानाच, भारताच्या युवा महिला ब्रिगेडने आधीच विजयाचा गुलाल उधळला आहे. एसीसी महिला रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये भारतीय महिला अ संघाने पाकिस्तान-अ संघाचा 8 विकेट्सनी पराभव केला. या विजयामुळे आज सायंकाळी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी चाहत्यांचा उत्साह चांगलाच वाढला आहे.
𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐚𝐫𝐞 𝐛𝐚𝐜𝐤 𝐨𝐧 𝐭𝐫𝐚𝐜𝐤 𝐰𝐢𝐭𝐭 𝐜𝐨𝐦𝐦𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 𝐰𝐢𝐧 𝐨𝐯𝐞𝐫 𝐏𝐚𝐤𝐩𝐬𝐭𝐬𝐭
बॉलिंग युनिटने टोन सेट करण्यासाठी एकसंधपणे गोळीबार केला आणि दुसऱ्या हाफमध्ये टॉप ऑर्डरने कोणतीही चूक केली नाही 🇮🇳#DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 #INDWvPAKW #ACC pic.twitter.com/FbflqmQgcL
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) 15 फेब्रुवारी 2026
एसीसी महिला रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये पहिल्या सामन्यात यूएईकडून झालेल्या धक्कादायक पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत होती, मात्र या विजयाने संघाने जोरदार उत्तर दिले. या सामन्यात वृंदा दिनेश हिने अफलातून फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिने फक्त 29 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा ठोकल्या. तिच्या आक्रमक खेळीमुळे भारताने लक्ष्य सहज गाठले आणि स्पर्धेतील आपल्या विजयाचे खाते उघडले.
गोलंदाजांनी मोडले पाकिस्तानचे कंबरडे
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी सावरण्याची संधीच दिली नाही. अचूक टप्पा आणि भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा संपूर्ण संघ 20 षटकेही खेळू शकला नाही. 18.5 षटकांत अवघ्या 93 धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. भारतासमोर विजयासाठी 94 धावांचे किरकोळ लक्ष्य होते.
पाकिस्तानला त्यांची लय कधीच सापडली नाही आणि 93 धावांवर पूर्ण झाले. भारत बॉलच्या बाबतीत क्लीनिकल होता आणि आता ते स्टाईलमध्ये त्याचा पाठलाग करतील 💪
कार्ड्स वर एक सरळ पाठलाग ~ किंवा एक वळण उलगडण्याची वाट पाहत आहे? 🤔#DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 #INDWvPAKW #ACC pic.twitter.com/jKVuBJ4ZmN
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) 15 फेब्रुवारी 2026
वृंदा दिनेशची वादळी अर्धशतक…
94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर वृंदा दिनेशने पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. तिने अवघ्या 29 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावांची स्फोटक खेळी केली. वृंदाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भारताने 11 व्या षटकातच विजय मिळवला.
आता लक्ष कोलंबोकडे, सायंकाळी 7 वाजता हाय-व्होल्टेज ड्रामा!
महिला संघाने मिळवलेल्या या विजयाने भारतीय चाहत्यांना जणू विजयाची नांदी दिली आहे. आज 15 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानचे मुख्य संघ आमनेसामने येणार आहेत.
येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारी स्पर्धा #T20WorldCup अनेक भिन्न भाषांमध्ये उपलब्ध असेल 🙌
अधिक 👉 https://t.co/IJxaBv4yoJ pic.twitter.com/liLyinnKdD
— ICC (@ICC) 15 फेब्रुवारी 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.