कोलंबो ठरला इतिहासाचा साक्षीदार! ईशान किशनचं वादळ, पाकिस्तान हादरला, भारताचा सर्वात मोठा स्कोर

भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक 2026 : श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर टी-20 विश्वचषक 2026 च्या 27 व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 7 बाद 175 धावा केल्या. भारत विरुद्ध पाकिस्तान टी-20 विश्वचषक सामन्यातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

भारताकडून ईशान किशनने 40 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 77 धावा केल्या. पाकिस्तानकडून सॅम अयुबने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले. खेळपट्टीचा विचार करता, पाकिस्तानने प्रामुख्याने फिरकी गोलंदाजीचा वापर केला. फिरकी गोलंदाजांनी 18 षटके टाकली, तर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने उर्वरित 2 षटके टाकली. संघाकडून 6 फिरकी गोलंदाजांसह एकूण 7 गोलंदाजांनी गोलंदाजी केली.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, भारताची खराब सुरुवात

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात अभिषेक शर्माच्या रूपात संघाने आपला पहिला बळी गमावला, जो कोणताही धाव न घेता पॅव्हेलियनमध्ये परतला.

पण, अभिषेक बाद झाल्यानंतर, ईशान किशनने डावाची सूत्रे हाती घेतली आणि तिलक वर्मा सोबत (46 चेंडू) 87 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे टीम इंडिया सहजपणे 200 धावांचा टप्पा गाठेल असे वाटत होते. पण, नवव्या षटकात ईशान बाद झाल्यानंतर, भारतीय डाव मंदावला.

ईशानच्या बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने 32 धावा केल्या. शिवम दुबेनेही 158.82 च्या स्ट्राईक रेटने 27 धावा केल्या. पाकिस्तानकडून सईम अयुबने सर्वाधिक 3 विकेट घेतले. याशिवाय कर्णधार सलमान आगा, उस्मान तारिक आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

हे ही वाचा –

Ishan Kishan Ind vs Pak : वादळी खेळणाऱ्या ईशान किशनला ‘ती’ चूक नडली, शतक हुकलं अन् पाकिस्तानला हायसं वाटलं, पाहा Video

आणखी वाचा

Comments are closed.