भारताची पहिली खाजगी सोन्याची खाण : सुरु होणारी भारताची पहिली खाजगी सोन्याची खाण; प्रति वर्ष 1000 किलो उत्पादन

भारताची पहिली खाजगी सोन्याची खाण: आपल्या भारतात सोन्याला खूप महत्त्व आहे. प्रत्येकाला भरपूर सोने हवे असते, परंतु आजकाल सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना इच्छा असूनही सोने खरेदी करणे अशक्य झाले आहे. कारण आपला भारत देश 800 ते 1000 टन सोने आयात करतो. भारत सोन्यासाठी इतर देशांकडून आयातीवर अवलंबून असल्याने परकीय चलनाच्या साठ्यावर परिणाम होतो. पण आता भारत सोन्याच्या बाबतीतही स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत आहे. कारण आता स्वातंत्र्यानंतरचा देशातील पहिला खासगी सोने खाण प्रकल्प सुरू होण्याच्या तयारीत आहे.
आंध्र प्रदेश राज्यातील कुर्नूल जिल्ह्यातील जोन्नागिरी येथे हा महत्त्वाचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा सुवर्ण खाण प्रकल्प मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या, येथे चाचणी खाणकाम सुरू आहे, आणि उत्पादन सुरू करण्यापूर्वी सर्व प्रक्रिया आणि प्रणाली तपासल्या जात आहेत. हा प्रकल्प जोन्नागिरी, पागीदिराई आणि एरागुडी गावांमध्ये सुमारे 598 हेक्टर क्षेत्रात पसरलेला आहे. चाचणी दरम्यान या खाणीतून आतापर्यंत अंदाजे 40 ते 60 किलो सोने काढण्यात आले आहे. भारतातील पहिली खाजगी सोन्याची खाण
2026 मध्ये एन. चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. प्रकल्पाचा मुख्य विकासक जिओमिसोर सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे, ज्याने थ्रीवेनी अर्थमूव्हर्स अँड इन्फ्रा आणि डेक्कन गोल्ड माईन्ससोबत भागीदारी केली आहे. जोनागिरी परिसरालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. ब्रिटीशांच्या काळात याचे उत्खनन करण्यात आले होते आणि काही अभ्यासानुसार, सम्राट अशोकाच्या काळात किंवा त्याही आधीच्या काळात या भागात सोन्याच्या खाणी अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत.
दरम्यान, भारत दरवर्षी 800 ते 1000 टन सोन्याची आयात करतो. ज्याचा परकीय चलनाच्या साठ्यावर परिणाम होतो. विशेषत: 2000 मध्ये कोलार गोल्ड फील्ड्स बंद झाल्यानंतर सोन्यावरील आयात अवलंबित्व आणखी वाढले. भारतातील पहिली खाजगी सोन्याची खाण
जोन्नागिरी प्रकल्पामुळे हे चित्र काही प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. जोन्नागिरी येथे खाण सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी सुमारे 400 ते 500 किलो सोन्याचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. पुढील काही वर्षांत ही क्षमता दरवर्षी सुमारे 1,000 किलोग्रॅमपर्यंत वाढू शकते. अंदाजे पुढील 15 वर्षे या क्षमतेने प्रकल्प चालू राहू शकेल. हा प्रकल्प भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. खाण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला चालना मिळणार असून, देशातील सोन्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
Comments are closed.