सोनमला ना अटक ना आत्मसमर्पण, राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक दावा, इंदौरच्या हत्याप्रकरणाला नवं
Crime News: मेघालयातील शिलॉंग येथे हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम रघुवंशी यांच्या प्रकरणाला आता वेगळच वळण लागलं आहे . इंदौरमधील हे जोडपं 11 मे 2025 रोजी हनिमूनसाठी शिलॉंगला गेलं होतं . मेघालयात पोहोचले पण 23 मे रोजी शेवटचं कुटुंबाशी बोलणं झालं आणि दोघांच्याही मोबाईल बंद झाले .काही दिवसांपूर्वी त्यांची भाड्याने घेतलेली स्कुटी पोलिसांना आढळली .आणि वेळी सोडून धबधब्याजवळ एका नाल्यात राजा रघुवंशीचा कुजलेला मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली . राजाचा मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता असलेली सोनम उत्तर प्रदेशात सापडली .सोनमचा घाईघाईत कोणालातरी मेसेज करतानाचा सीसीटीव्ही समोर आल्यानं या संपूर्ण प्रकरणा भोवतीचा गुढ आणखी वाढलं . मात्र आता सोनमणे पोलिसांना आत्मसमोर पण केल्याच्या आणि तिला अटक झाल्याची माहिती राजाचा भाऊ विपिन रघुवंशी यांना भेटायला आहे .सोनम ला अटक झालेली नाही किंवा तिने सरेंडर केला नाही अशी माहिती विपिन रघुवंशी यांनी दिली आहे .
सोनमनं आत्मसमर्पण केलेलं नाही?
विपिन रघुवंशी ने दिलेल्या माहितीनुसार 8 जून 2025 च्या रात्री राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनमने गोविंदला म्हणजेच सोनमच्या भावाला फोन केला होता . सोनमने फोनवर मी बिट्टी बोलतीये भाऊ असे सांगितल्यानंतर तिला आधी तुझा चेहरा दाखवतो कोण आहे तसे विचारले .तिने व्हिडिओ कॉल केल्यानंतर आम्हाला ती सोनमच असल्याची खात्री पटली असं विपिन रघुवंशी यांनी सांगितले .
व्हिडिओ कॉल मुळे फोन केलेली मुलगी सोनम असल्याची माहिती पटल्यानंतर विपिन रघुवंशीने तातडीने उत्तर प्रदेश पोलिसांना फोन केला .त्यानंतर पोलीस तिथे पोचले व सोनम ला त्यांच्यासोबत घेऊन गेले .ती फक्त तिथे बसली होती .पोलिसांनी तिला अटक केलेली नाही .सोनमने आत्मसमोरपणही केलेले नाही .या सर्व अफवा असल्याची माहिती विपिन रघुवंशीने दिली .
विपिन रघुवंशींनी सांगितलं…
मेघालयचे डीजीपी सोनम रघुवंशीला मारेकरी म्हणत असले तरी सोनमची अद्याप व्यवस्थित चौकशीही झालं नसल्याचं विपिन रघुवंशी यांनी सांगितलं .सोनमला अधिकृतपणे काहीही सांगितले गेलेले नाही .त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत आणखी वाढली आहे .पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले असून तर या प्रकरणात पुढे काय घडते हे महत्त्वाचं ठरणार आहे .सोनम आणि राजा या दोघांचं लग्न ठरलं त्यावेळी सर्वजण खूप आनंदी होते .सोनम असं काही करू शकते असा संशयही आम्हाला नव्हता .दोघांनी परतीचा तिकीटही बुक केलेलं नव्हतं असं राजा रघुवंशीच्या भावाने सांगितले .
Comments are closed.