Jayant Patil spoke to reporters about the discussion of joining BJP


जयंत पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची मागणी शरद पवारांकडे केली होती. तर दुसरीकडे जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना नेहमीप्रमाणे सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षातील भूमिकेवरून युवा आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. याचपार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची मागणी शरद पवारांकडे केली होती. तर दुसरीकडे जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र जयंत पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना नेहमीप्रमाणे सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. (Jayant Patil spoke to reporters about the discussion of joining BJP)

भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी माध्यमांना सुनावले. ते म्हणाले की, तुम्ही माय बाप आहात. तुम्ही जे चालवणार तेच चालणार. परंतु मी इथेच आहे आणि पक्षाचा मेळावा घेत आहे. पण तरीही तुम्ही असं का करता? मला माहीत नाही. परंतु भाजपा हा फार मोठा पक्ष आहे. त्यामुळे माझ्यासारख्या गरिबाला का सारखं वेठीस धरता? माझ्या भेटी वेगळ्या कारणासाठी होतात. विरोधी पक्षाचे नेते सत्ताधाऱ्यांना भेटू शकत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करत जयंत पाटील यांनी सर्व चर्चा थांबवण्याची विनंती केली. तसेच पक्षांतरासाठीच भेटलो असेल असा गैरसमज करून घेऊ नका. कारण तुम्ही बातमी चालवता, त्यामुळे मला प्रसिद्धी मिळते आणि माझीही कामं होतात, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी पत्रकारांना लगावला.

हेही वाचा – Politics : फडणवीस करून जातात आणि नाव दुसऱ्याचं लागतं; भाजपाच्या नेत्याने अजितदादांविरोधात थोपटले दंड

जयश्री पाटील यांच्या भाजपा प्रवेशावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

दरम्यान, दिवंगत वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यासंदर्भात जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते वसंतदादांपर्यंत या कृष्णाकाठची माणसं विचाराला पक्की होती. याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला पाहिजे होतं. पण आता परिस्थिती बदलली आणि काही वेगळे निर्णय झाले. त्यामुळे यावर मी बोलणार नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी जास्त बोलणं टाळलं.

हेही वाचा – Sanjay Raut : सलीम कुत्ता प्रकरणाच्या एसआयटीचे काय झाले? राऊतांचा फडणवीसांना सवाल



Source link

Comments are closed.