न्यायमूर्ती जॉय मल्ल्याने बागची न्यायाधीश म्हणून शपथ घेतली

सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी बागची यांना शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या एकत्रित अखिल भारतीय ज्येष्ठतेमध्ये बागची 11 व्या क्रमांकावर आहेत. न्यायमूर्ती बागची यांच्या शपथविधीमुळे आता आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 33 झाली आहे. तर एकूण मंजूर पदे 34 आहेत. न्यायमूर्ती बागची हे सर्वोच्च न्यायालयात सहा वर्षांहून अधिक काळ काम करतील. या काळात त्यांना भारताचे सरन्यायाधीश होण्याची संधीही मिळणार आहे. ते 2 ऑक्टोबर 2031 रोजी निवृत्त होतील, त्यापूर्वी ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होतील.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने जॉयमाल्या बागची यांचे नाव 6 मार्च रोजी प्रस्तावित केले होते. कॉलेजियमने केंद्र सरकारला न्यायमूर्ती बागची यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून बागची यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती.

27 जून 2011 रोजी न्यायमूर्ती बागची यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 4 जानेवारी 2021 रोजी त्यांची आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात बदली झाली. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2021 रोजी ते पुन्हा कोलकाता उच्च न्यायालयात परतल्यापासून तिथेच सेवा देत आहेत. न्यायमूर्ती बागची यांनी 13 वर्षांहून अधिक काळ उच्च न्यायालयात काम केले आहे.

Comments are closed.